आरोग्य

थंडीत ओठांची काळजी कशी घ्यावी

हिवाळ्यात तापमान घटते आणि वातावरणात गारवा वाढतो. या काळात आरोग्याबरोबरच त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. थंडीमुळे त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात. काही सोपे घरगुती उपाय करून ओठ आणि त्वचा निरोगी ठेवता येऊ शकते.

फाटलेल्या ओठांना मऊ आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी मध हा उत्तम उपाय आहे. रोज २–३ वेळा ओठांवर मध लावा. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी मध लावल्यास अधिक फायदा होतो.

दिवसातून २–३ वेळा ओठांवर ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल लावल्यास फाटलेल्या ओठांना आराम मिळतो.

१ चमचा दूध आणि १ चमचा मध एकत्र करून हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर हलक्या हाताने ओठांवर लावा.

ओठ फाटल्यानंतर त्यावरील सोललेली त्वचा काढू नका. त्यामुळे ओठ अधिक फाटू शकतात आणि जखम होण्याची शक्यता असते.

घराबाहेर पडताना ओठांवर लिप लोशन किंवा लिप बाम लावणे उपयुक्त ठरते.

हिवाळ्यात अतिशय थंड पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा अधिक कोरडी पडू शकते.

काही जणांना क्रीम लावल्यानंतर त्वचेवर रिअ‍ॅक्शन येऊ शकते. त्यामुळे कोणतीही क्रीम वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

2 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

2 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

4 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

8 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

8 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

8 तास ago