Shirur Police Station
शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचे शिरूर पोलिसांनी सांगितले आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रणव अशोक उबाळे (रा. रामलिंग रोड, शिरुर ता. शिरुर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, शिरूर शहरात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी तिच्या मामाच्या गावी राहत असून, ती महाविद्यालयात जात असताना प्रणव उबाळे हा वारंवार भेटून तिच्याशी बोलण्याबाबत दबाव टाकत होता. मुलगी भेटण्यास व बोलण्यास नकार देत होती. यामुळे प्रणव याने तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत तसेच शाळेबाहेर तुझी बदनामी करेल अशी धमकी देखील दिली. हा त्रास असह्य झाल्याने तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करत आहेत.
शाळकरी व कॉलेज शिकणाऱ्या मुली, महिला शिरूर शहरात पुर्णपणे सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शिरूर शहर परिसरातील कॉलेज व इतर शालेय परिसरात रोड रोमियांचा चांगलाच धुमाकुळ चालू असून शिरूर पोलिसांनी आता कडक कारवाई करणे गरजेचे आहे. रोडरोमिंओवर दंडात्मक कारवाई होत असल्याने दंड भरून हे रोड रोमिओ पुन्हा मोकाट सुटत असून त्यांना प्रसाद देवून धिंड काढणे गरजेचे आहे. याबाबत आता शिरुर पोलिसांनी आता अॅक्शन मोडमध्ये येवून कडक कारवाई करावी, अशी मागणी परीसरातील महिला व नागरीकांकडून होत आहे.
शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या महिलेसोबत झालेल्या चॅटींगच्या रागातून…
शिरूर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…
मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…