आरोग्य

साबणानं केस धुण्याचा दुष्परिणाम

घरातला शाम्पू संपल्यावर तो लगेच आपण्याऐवजी आपण साबणाने केस धुतो. अर्थात सगळेच असं करत नाहीत मात्र अनेक जण करतात. साबणाने केस धुणे योग्य आहे की अयोग्य हे जाणून घ्या. साबणात असलेले घटक हे त्वचेला अनुसरुन असतात.

डोक्याची त्वचा त्यावरील केस आणि शरीराची त्वचा जरा वेगळी असते. दोन्हीला विविध प्रकारचे पोषण लागते. जसे की साबणात जास्त अल्कलाइन पातळी (pH)असते. त्वचेसाठी ही पातळी चालते. पण केसांसाठी ते आरोग्यदायी ठरत नाही. आपल्या केसांचा नैसर्गिक pH किंचित आम्लीय असतो. ज्यामुळे केसांचा बाहेरचा थर म्हणजेच क्युटिकल व्यवस्थित बंद राहते आणि केस मऊ राहतात आणि सुंदर दिसतात. परंतु साबणामुळे हा pH स्तर बिघडतो आणि क्युटिकल उघडे पडतात. यामुळे केस कोरडे, राठ होतात. साबण लावल्यावर केस पटकन तुटतात.

साबणात असलेले काही कठोर क्लिन्झर्स केसांतील नैसर्गिक तेल पटकन काढून टाकतात. तेल काढतात म्हणजे चांगलेच आहे असे अनेकांना वाटते मात्र हे तेल म्हणजे आपल्या केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर सारखे काम करते. ते तेल कम झाल्यावर केस पटकन गुंततात. दीर्घकाळ अशी परिस्थिती राहिली तर तुटण्याबरोबरच केसांच्या मुळांवरही ताण येतो. ज्यामुळे केस गळती वाढण्याची शक्यता असते. केस गळण्यामागे हार्मोनल बदल, पोषणाची कमतरता, आजारपण किंवा ताणतणाव ही कारणे तर असतातच मात्र साबणाचा वापर करणे हे ही एक कारण ठरु शकते. साबणाचा परिणाम जास्त करून केसांच्या गुणवत्तेवर होतो. केस कोरडे पडतात.

केस धुण्यासाठी शाम्पू सगळ्यांना आवडतोच असे नाही. अशा वेळी घरी मिश्रणे तयार करा. त्याने केस धुवा. शिकेकाईचा वापर करु शकता. त्यामुळे केस गळायचेही थांबतात तसेच नवीन केस येतातही. मात्र शाम्पू नाही म्हणून साबण वापरणे योग्य नाही. जी वस्तू ज्या कामासाठी तयार केली जाते ती त्याच कामासाठी वापरावी हा साधा नियम साबणालाही लागू पडतो. साबणामुळे केसांने संपूर्ण आरोग्य खराब होते असे नाही मात्र केस कोरडे होऊन राठ नक्की होतात. त्यामुळे साबणाने केस धुणे टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

13 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

13 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

14 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

18 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

18 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

19 तास ago