चष्मा लागणं ही आता खूपच सामान्य बाब झाली आहे. चाळिशी जवळ आली तरी चष्मा लागलेला नाही, अशा व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आपल्या आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही, शिवाय कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या स्क्रिनचा वापर खूप जास्त वाढला आहे.
आकाशाकडे, हिरवळीकडे नजर लावून पाहाणं, खूप दूरवर नजर लावून पाहाणं हे सगळंच आता कमी झालेलं आहे. त्याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतोच. त्यामुळेच हल्ली चष्मेबहाद्दुरांचं प्रमाण वाढलं आहे. काही लोक खूप स्टायलिश पद्धतीने चष्मा कॅरी करतात. पण काही लोकांना मात्र तो मुळीच आवडत नाही तुम्हालाही चष्मा लावणं आवडत नसेल किंवा नजर तेज करायची असेल तर या काही गोष्टी काही दिवस नियमितपणे करून पाहा.
चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी…
डोळ्यांची दृष्टी नैसर्गिकपणे वाढवून चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी काय करावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ योग अभ्यासकांनी officialcanwinn या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी साधे सोपे ४ उपाय सुचवले आहेत.
पहिला उपाय म्हणजे सगळ्यात आधी तर दोन्ही तळहात एकमेकांवर घासा आणि नंतर ते दोन्ही तळवे डोळ्यांना लावा. तळहातांमध्ये तयार झालेली उष्णता डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते.
यानंतर बोटाच्या टोकाला थोडी लाळ लावावी आणि ती काजळ लावल्याप्रमाणे आपल्या डोळ्यांना लावावी. आपले अनेक विकार कमी करण्यासाठी लाळ उपयुक्त ठरते. त्यामुळेच तर सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता पाणी प्यावं, असं सल्ला काही याेगतज्ज्ञ नेहमीच देतात.
त्यानंतर हाताच्या पहिल्या ३ बोटांपैकी एक बोट एका डोळ्याच्या नाकजवळ असणाऱ्या कोपऱ्यावर, दुसरे बोट कपाळावर दोन्ही भुवयांच्या मधे आणि तिसरे बोट दुसऱ्या डोळ्याच्या नाकाजवळ असणाऱ्या कोपऱ्यावर ठेवा आणि तिथल्यातिथेच ५ वेळा बोट क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज या पद्धतीने गोलाकार फिरवा.
त्यानंतर बोटाच्या टोकांनी डोळ्यांच्या आसपासचा भाग, कपाळ याठिकाणी १५ ते २० सेकंदासाठी टॅपिंग करा. यानंतर पुन्हा दोन्ही तळहात एकमेकांवर घासून हातांची उष्णता डोळ्यांना द्या. काही महिने नियमितपणे हा उपाय केल्यास चष्म्याचा नंबर कमी होईल, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…