सांधे दुखी, गुढगे दुखी, कंबर दूखी, पाठीचे आजार, कॅल्शियम ची कमतरता, पायाला मुंग्या येणे, डोके हाताला मुंग्या येणे यासाठी रामबाण उपाय
सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्यासाठी जवस,
तीळ, आळीव, गव्हाच्या एवढा चुना, बाभळीच्या शेंगा बिया सकट वाळवून त्याचे चूर्ण तयार करा चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या. ३ महिन्यात गुडघेदुखी व इतर मणक्याचे सर्व आजार कायमस्वरूपी दुर होतील.
कारणे व उपचार
बदललेली जीवनशैलीमुळे आज़ 50 वर्षी च्या वरील
खूप लोकांना भेडसावणारी समस्या. चुकीच्या सवयी, व्यसन, आरोग्याकडे दुर्लक्ष.
आजाराची लक्षणे
1 हात बधिर होणे, खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत मुग्या येणे. इत्यादी लक्षणे दिसून येतात. मणक्याचा आजार झालेल्या रुग्णामध्ये कंबरेच्या किंवा मानेच्या मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ कमी झाल्यामुळे दोन मणके हे एकमेकांवर घासल्याने मणक्याची झीज होऊन त्या ठिकाणी गॅप तयार होतो.किंवा मणक्यातील गादी घासली जाते.
त्यामुळे मुंग्या येतात किंवा दुखते, कंबरेत दुखणे,हाता पायांना मुग्या येणे.
2 सकाळी उठताना त्रास होणे.
3 चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे.
4 पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे.
5 मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे.
6 शौचाला बसता न येणे.
7 चक्कर येणे.
मणक्याचे आजार होण्याची कारणे
1 डोक्या खाली मोठ्या उशीचा वापर करणे खांद्यावर किंवा पाठीवर जड वजनाच्या वस्तू उचलणे.
2 खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकलवरून प्रवास करणे.
3 अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बैठे काम करणे.
4 पोट साफ न होणे, सतत वेदनाशामक औषधी खाणे.
5 स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा.
6 गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे.
7 जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे उदा. वांगे, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ इ. अनेक कारणांमुळे शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे आजार उद्भवतात.
8 संकरीत धान्य व फवारलेले धान्य तसेच पालेभाज्या यामुळे हाडांना ठिसूळपणा येतो
मणक्यातील हाडे ठिसूळ होण्याला व्यायामाचा अभाव ,
कायमस्वरूपी ताण तणावात राहणे असे
अनेक कारणे आहेत.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…
मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…