आरोग्य

तरुणाईमध्ये वाढते आहे या कॅन्सरचे प्रमाण, कॅन्सरचा हा कोणता प्रकार, कशी ओळखायची लक्षण

प्रत्येकाचीच लाईफस्टाईल, खाण्यापिण्याचे पदार्थ यात एवढा बदल होत आहे की त्याचा परिणाम हळूहळू आपल्या आरोग्यावर दिसू लागला आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या लोकांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. बदलत्या जीवनशैलीचा आणि आहारात झालेल्या काही ठराविक बदलांचाच एक परिणाम म्हणजे सध्या कोलन कॅन्सरचे प्रमाण जगभरातच खूप वाढले आहे. मोठ्या आतड्यांना होणारा हा आजार असून २५ ते ४९ या वयोगटातील व्यक्तींमध्ये तो जास्त दिसत आहे, असा निष्कर्ष दि लॅसेंट ऑन्कोलॉजीने प्रकाशित केलेल्या अहवालात दिला आहे.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शारिरीक व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा ही सगळी या आजाराची मुख्य कारणं असू शकतात, असंही त्यांनी सांगितलं आहे. काही अभ्यासकांच्या मते मुळ भारतीय खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली यामुळे या आजारापासून आपण लांब राहू शकतो. पण आता नव्या पिढीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली पुर्णपणे बदलून गेल्या आहेत. त्यांच्यावर कुठेतरी नियंत्रण आणणं गरजेचं आहे.

कोलन कॅन्सरची लक्षणं

1) सतत पोट दुखणं, ओटीपोटात वेदना होणं.

2) काहीही खाण्याची इच्छा न होणं आणी वजन कमी होणं.

3) शौचामधून रक्त पडणे.

4) बद्धकोष्ठतेचा त्रास होणे किंवा शौचाला जाऊन आल्यानंतरही पोट पुर्णपणे साफ झालं आहे, असं न वाटणे.

5) खूप थकवा येऊन अशक्तपणा जाणवणे.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

11 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

11 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

13 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago