आरोग्य

तरुणाईमध्ये वाढते आहे या कॅन्सरचे प्रमाण, कॅन्सरचा हा कोणता प्रकार, कशी ओळखायची लक्षण

प्रत्येकाचीच लाईफस्टाईल, खाण्यापिण्याचे पदार्थ यात एवढा बदल होत आहे की त्याचा परिणाम हळूहळू आपल्या आरोग्यावर दिसू लागला आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या लोकांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. बदलत्या जीवनशैलीचा आणि आहारात झालेल्या काही ठराविक बदलांचाच एक परिणाम म्हणजे सध्या कोलन कॅन्सरचे प्रमाण जगभरातच खूप वाढले आहे. मोठ्या आतड्यांना होणारा हा आजार असून २५ ते ४९ या वयोगटातील व्यक्तींमध्ये तो जास्त दिसत आहे, असा निष्कर्ष दि लॅसेंट ऑन्कोलॉजीने प्रकाशित केलेल्या अहवालात दिला आहे.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शारिरीक व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा ही सगळी या आजाराची मुख्य कारणं असू शकतात, असंही त्यांनी सांगितलं आहे. काही अभ्यासकांच्या मते मुळ भारतीय खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली यामुळे या आजारापासून आपण लांब राहू शकतो. पण आता नव्या पिढीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली पुर्णपणे बदलून गेल्या आहेत. त्यांच्यावर कुठेतरी नियंत्रण आणणं गरजेचं आहे.

कोलन कॅन्सरची लक्षणं

1) सतत पोट दुखणं, ओटीपोटात वेदना होणं.

2) काहीही खाण्याची इच्छा न होणं आणी वजन कमी होणं.

3) शौचामधून रक्त पडणे.

4) बद्धकोष्ठतेचा त्रास होणे किंवा शौचाला जाऊन आल्यानंतरही पोट पुर्णपणे साफ झालं आहे, असं न वाटणे.

5) खूप थकवा येऊन अशक्तपणा जाणवणे.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

4 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

4 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

4 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

4 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

4 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

6 तास ago