सकाळचा नाश्ता दिवसाचं पहिले अन्न असते, जे शरीराला दिवसभर उर्जा देण्यासाठी फायदेशीर ठरते. नाश्ता वेळच्यावेळी करणं महत्वाचं असतं. नाश्ता वेळेवर केला नाही तर थकवा येतो नि अशक्तपणा जाणवतो आणि दिवसभर उत्साह वाटत नाही, कामात मनही लागत नाही. सकाळच्या वेळी नाश्ता केल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते आणि आजारांपासून बचाव होतो. म्हणूनच रोज नाश्ता करून दिवसाची सुरूवात करावी.
सकाळी ७ ते ८ दरम्यान नाश्ता करण्याची सगळ्यात योग्य वेळ असते. जर या वेळेत नाश्ता करू शकत नसाल तर सकाळी १० च्या आत नाश्ता करा. कारण रात्रभर उपाशी राहिल्यामुळे सकाळी शरीराला एनर्जीची आवश्यकता असते. सकाळी शरीरातील ग्लुकोजचा स्तर कमी असतो. नाश्ता केल्यानं शरीराला पुरेपूर एनर्जी मिळते आणि पचनक्रियाही चांगली राहते. सकाळी जर उशीरा उठलात तर उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करायला हवा. सकाळी वेळेवर नाश्ता केल्यानं डायबिटीस, बीपीचे त्रास उद्भवत नाहीत. जर वेळेवर नाश्ता करत नसाल तर वजन वाढू शकतं, कारण नाश्ता स्किप केल्यामुळे इतर पदार्थ खाण्याचे क्रेव्हिग्स होतात. अशा वेळी जास्त खाऊ शकल्याने वजन वाढू शकतं.
नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ
ओट्स हा एक हेल्दी आणि पौष्टीक नाश्ता आहे. यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. ओट्स दूध, दही किंवा पाण्यासह खाऊ शकता.
दलिया ओट्स प्रमाणे एक पौष्टीक पदार्थ आहे. दलिया खिचडी किंवा दलिया उपमाचा नाश्त्याला समावेश करू शकता.
फळं आणि दही: फळं आणि दही एक स्वादीष्ट, पौष्टीक कॉम्बिनेशन आहे. दह्यातून प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते, ज्यामुळे स्नायू चांगले राहतात.
पोहे खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर्स मिळतात. पोहे खाल्ल्या नंतर जवळपास ३ ते ४ तास भूक लागणार नाही.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…