आरोग्य

हे ५ पदार्थ वाढवतात कफाचे प्रमाण हेल्दि घशासाठी हे पदार्थ खाणे टाळा

कफ झाला की एक वेळ खोकला परवडला पण कफ नको. असं म्हणायची वेळ येते. कारण सतत ठसका लागत राहतो. धास लागत राहते. कफ जाता जात नाही. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले तरी परत येतो. त्याची काही कारणे आहेत. ती कारणे म्हणजे आपण खातो ते अन्न. काही पदार्थ कफ वाढवतात. असे पदार्थ पौष्टिकही असू शकतात. पण ज्यांना वारंवार कफाचा त्रास होतो, त्यांनी असे पदार्थ टाळणेच योग्य.

असे पाच पदार्थ आहेत ज्यांचे आपण सतत सेवन करतो. आणि त्यामुळे कफ वाढतो. जाणून घ्या कोणते पदार्थ आहेत.

1) दही शरीरासाठी चांगले असले तरी ते थंड असते. ज्यांना वारंवार सर्दी, खोकला , कफ होतो अशा लोकांनी दही खाणे टाळा.

2) अनेकांना तिखट पदार्थ खाण्याची आवड असते. पण तिखट पदार्थांमुळे घशाला त्रास होतो. त्यामुळे कफ, खोकला होतो. तिखट पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा.

3) गार पेये प्यायला सगळ्यांनाच आवडतात. पण गार पेये घशासाठी चांगली नाहीत. त्यांच्यामुळे कफच नाही तर सर्दी, खोकलाही वाढतो.

4) तळलेल्या पदार्थांमुळे हमखास कफ वाढतो. असे पदार्थ स्वास्थ्यासाठीही चांगले नाहीत. पदार्थ तळण्यापेक्षा कमी तेलात शॅलो फ्राय करा.

5) कोणत्याही प्रक्रियेतून गेलेले अन्न म्हणजेच पॅकेट फूड घशासाठी चांगले नाही. त्यात भरपूर रसायनयुक्त मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. असे पदार्थ खाणे टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

14 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

22 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

22 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

22 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

22 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

22 तास ago