जगातल्या 15 ते 20 टक्के लोकांना अर्धशिशीने ग्रासलेलं आहे. मेंदूचा एकाच भागात असह्य वेदना होतात, तेव्हा हा त्रास होतो. नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा हा त्रास निराळा असतो आणि त्रासही जास्त असतो. अर्धशिशीचा त्रास असणाऱ्या लोकांना ठराविक काळानंतर हा त्रास होतच राहतो. पण हा त्रास मागे लागलेला असला, तरी जीवनशैलीत काही छोटे बदल करून या त्रासावर नियंत्रण मिळवता येतं.
1) अर्धशिशीच्या सामान्य लक्षणांमध्ये डोक्याचा संपूर्ण भाग किंवा अर्धा भाग दुखतो. ऊन, कर्कश आवाज, दुर्गंध, मळमळ किंवा उलट्या यांसारख्या संवेदनक्षमतेशी संबंधित गोष्टींमुळे अर्धशिशीचा त्रास होतो.
2) विशेषतः फ्रिज, मायक्रोवेव्ह आणि रेडीमेड प्रकारचे पदार्थ खाल्यामुळे अर्धशिशीचा त्रास वाढू शकतो.
३) चायनीज अन्न ज्यामध्ये अजिनोमोटो आणि मोनोसोडियम ग्लूटामेट, खूप चीज, डार्क चॉकलेट असते त्यामुळेही अर्धशिशीचा त्रास निर्माण होऊ शकतो तसेच वाढू शकतो.
४) सतत डोक्यावरुन आंघोळ केल्याने आणि एसीमध्ये खूप काळ बसल्यानेही अर्धशिशीचा त्रास वाढू शकतो. अनियमित मासिक पाळीमुळेही स्त्रियांमध्ये अर्धशिशीचा त्रास वाढतो.
(सोशल मीडियावरून साभार)
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…