पाबळ (सुनिल जिते): गेली एक-दीड महिन्यापासून कान्हूर मेसाई (ता. शिरूर) परिसरात शेतात बिबट्याचा वावर आहे. यामुळे वनखात्याने ही बाब गांभीर्याने घेऊन या परिसरात पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कान्हूर व मिडगुलवाडी गावाच्या शिवेच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. काही शेतकऱ्यांना बाजरी तसेच मक्याच्या शेतात शुक्रवारी(ता.०१) बिबट्या निदर्शनास आला आहे.रात्रीचा गाडीवर प्रवास करताना काहींना रस्त्यावर दिसल्यामुळे बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कान्हूर परिसरातील गारकोलवाडी, मिडगुलवाडी, फलकेवाडी, या ठिकाणावरून अनेक विध्यार्थी कान्हूर मेसाई येथे शिक्षणासाठी जात आहे अनेक जण सायकल किंवा पायी जात असल्याने मुलांना बिबट्याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी येथील नारिकांनी केली आहे.
परिसरातून बिबट्या दिसत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काल पुन्हा बिबट्या दिसल्याचे सांगितल्यानंतर रेस्क्यू टीम व कर्मचारी जाऊन पाहणी केली असून तपासणी केली जात आहे. बिबट्याला लपण्यासाठी याठिकाणी पुरेशा प्रमाणात जागा आहे. त्यामुळे त्याचा वावर नाकारता येत नाही.
नारायण राठोड- वनरक्षक अधिकारी, शिरूर
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…