पाबळ (सुनिल जिते): गेली एक-दीड महिन्यापासून कान्हूर मेसाई (ता. शिरूर) परिसरात शेतात बिबट्याचा वावर आहे. यामुळे वनखात्याने ही बाब गांभीर्याने घेऊन या परिसरात पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कान्हूर व मिडगुलवाडी गावाच्या शिवेच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. काही शेतकऱ्यांना बाजरी तसेच मक्याच्या शेतात शुक्रवारी(ता.०१) बिबट्या निदर्शनास आला आहे.रात्रीचा गाडीवर प्रवास करताना काहींना रस्त्यावर दिसल्यामुळे बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कान्हूर परिसरातील गारकोलवाडी, मिडगुलवाडी, फलकेवाडी, या ठिकाणावरून अनेक विध्यार्थी कान्हूर मेसाई येथे शिक्षणासाठी जात आहे अनेक जण सायकल किंवा पायी जात असल्याने मुलांना बिबट्याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी येथील नारिकांनी केली आहे.
परिसरातून बिबट्या दिसत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काल पुन्हा बिबट्या दिसल्याचे सांगितल्यानंतर रेस्क्यू टीम व कर्मचारी जाऊन पाहणी केली असून तपासणी केली जात आहे. बिबट्याला लपण्यासाठी याठिकाणी पुरेशा प्रमाणात जागा आहे. त्यामुळे त्याचा वावर नाकारता येत नाही.
नारायण राठोड- वनरक्षक अधिकारी, शिरूर
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…