Lavc57.107.100
पोटाची चरबी वाढणे ही एक मोठी समस्या आहे. त्यासाठी व्यायाम, डाएट आदी करणे भाग आहे. त्याशिवाय वजन कमी होणार नाही. मात्र ज्यांचे वजनही आटोक्यात आहे मात्र सारखे पोट सुटते अशा लोकांना ब्लोटींगची समस्या असते. अपचन झाल्यावर पोटाचा आकार वाढतो. पोट फुगते आणि कपड्यांतूनही दिसून येते.
काही वातूळ खाल्यावर तसेच तळलेले खाल्यावर ही समस्या उद्भवते. काहींना झोपेच्या कमतरतेमुळे ब्लोटींग होते. यावर उपाय करणे तसे सोपे आहे जाणून घ्या काय करायला हवे. सतत ब्लोटींग होत असेल तर ही समस्या कमी होण्यासाठी किमान सात ते आठ दिवसाचा कालावधी लागतोच. तेवढे दिवस काही नियम लक्षात ठेवा. आहारात काय घ्यावे काय नाही हे जाणून घ्या. त्यानुसार आहार घेतल्यावर ब्लोटींगची समस्या नक्कीच दूर होईल.
1) दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. पोट साफ होण्यासाठी सगळ्यात औषधी काही असेल तर ते पाणीच. पोट साफ झाल्यावर अडकलेली घाण निघून जाईल. त्यामुळे पोट छान साफ होईल.
2) सगळ्यात आधी साखर आणि तेलकट पदार्थ खाणे बंद करा. सतत गॅस होणाऱ्यांना सोडा प्यायची सवय असते. मात्र सारखा सोडा प्यायल्यामुळे ब्लोटींग होते. साखर आणि सोडा टाळायचा.
3) आहारात आलं असायला हवे. आल्याचे पाणी प्यायवे. तसेच सब्जाचे पाणी रोज प्या. सब्जा पचन चांगले व्हावे यासाठी फायद्याचा आहे. पोटाला गारवा ही मिळतो. ब्लोटींगमुळे जर दुखत असेल तर त्रास कमी होते.
4) चीज सारखे दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे ब्लोटींगची समस्या वाढते. पाव, ब्रेड असे बेकरी प्रॉडक्ट्सही खाऊ नका. पोटात जाऊन फुगणारे काहीही खाणे चांगले ठरणार नाही. त्यामुळे हे सगळे पदार्थ टाळणे फायद्याचे ठरेल.
5) जिऱ्याचे पाणी, बडीशेपेचे पाणी पचनासाठी फार उपयुक्त ठरते. त्यामुळे रोज न चुकता असे पाणी प्यायचे. ब्लोटींग झटपट कमी होईल. पोट साफ होईल आणि पोटाचा फुगलेला भाग लगेच कमी होईल. हे उपाय करुन जर फरक पडत नसेल तर, वेळीच डॉक्टरांकडे जाऊ या. पोट फुगण्यामागे इतरही कारणे असू शकतात.
(सोशल मीडियावरून साभार)
सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…
मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…
शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…
न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…