Lavc57.107.100
पोटाची चरबी वाढणे ही एक मोठी समस्या आहे. त्यासाठी व्यायाम, डाएट आदी करणे भाग आहे. त्याशिवाय वजन कमी होणार नाही. मात्र ज्यांचे वजनही आटोक्यात आहे मात्र सारखे पोट सुटते अशा लोकांना ब्लोटींगची समस्या असते. अपचन झाल्यावर पोटाचा आकार वाढतो. पोट फुगते आणि कपड्यांतूनही दिसून येते.
काही वातूळ खाल्यावर तसेच तळलेले खाल्यावर ही समस्या उद्भवते. काहींना झोपेच्या कमतरतेमुळे ब्लोटींग होते. यावर उपाय करणे तसे सोपे आहे जाणून घ्या काय करायला हवे. सतत ब्लोटींग होत असेल तर ही समस्या कमी होण्यासाठी किमान सात ते आठ दिवसाचा कालावधी लागतोच. तेवढे दिवस काही नियम लक्षात ठेवा. आहारात काय घ्यावे काय नाही हे जाणून घ्या. त्यानुसार आहार घेतल्यावर ब्लोटींगची समस्या नक्कीच दूर होईल.
1) दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. पोट साफ होण्यासाठी सगळ्यात औषधी काही असेल तर ते पाणीच. पोट साफ झाल्यावर अडकलेली घाण निघून जाईल. त्यामुळे पोट छान साफ होईल.
2) सगळ्यात आधी साखर आणि तेलकट पदार्थ खाणे बंद करा. सतत गॅस होणाऱ्यांना सोडा प्यायची सवय असते. मात्र सारखा सोडा प्यायल्यामुळे ब्लोटींग होते. साखर आणि सोडा टाळायचा.
3) आहारात आलं असायला हवे. आल्याचे पाणी प्यायवे. तसेच सब्जाचे पाणी रोज प्या. सब्जा पचन चांगले व्हावे यासाठी फायद्याचा आहे. पोटाला गारवा ही मिळतो. ब्लोटींगमुळे जर दुखत असेल तर त्रास कमी होते.
4) चीज सारखे दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे ब्लोटींगची समस्या वाढते. पाव, ब्रेड असे बेकरी प्रॉडक्ट्सही खाऊ नका. पोटात जाऊन फुगणारे काहीही खाणे चांगले ठरणार नाही. त्यामुळे हे सगळे पदार्थ टाळणे फायद्याचे ठरेल.
5) जिऱ्याचे पाणी, बडीशेपेचे पाणी पचनासाठी फार उपयुक्त ठरते. त्यामुळे रोज न चुकता असे पाणी प्यायचे. ब्लोटींग झटपट कमी होईल. पोट साफ होईल आणि पोटाचा फुगलेला भाग लगेच कमी होईल. हे उपाय करुन जर फरक पडत नसेल तर, वेळीच डॉक्टरांकडे जाऊ या. पोट फुगण्यामागे इतरही कारणे असू शकतात.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…