तुम्ही शहरात राहा किंवा खेड्यात राहा, हल्लीची जीवनशैली सपाटून बदलून गेली आहे. प्रत्येकाचं जीवन हे धकाधकीचं झालं आहे. त्यामुळेच आता शरीर आणि मनाच्या तंदुरुस्तीसाठी रोज योगा आणि प्राणायाम करणं आवश्यक झालं आहे. प्रत्येक प्राणायामाचे फायदे वेगवेगळे असतात. त्यापैकीच अत्यंत महत्त्वाचे प्राणायाम म्हणजे अनुलोम-विलोम. अनुलोम-विलोम प्राणायामाचे फायदे काय आहेत? हा प्राणायाम कधी करायचा असतो.
अनुलोम-विलोम प्राणायाम कसा करावा
अनुलोम-विलोम प्राणायाम फार कठिण नाही. हा प्राणायाम करण्यासाठी सर्वात आधी आरामदायक आसनात बसावे लागते. या प्राणायामात पाठ सरळ आणि आरामदायक ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रथम, आपल्या उजव्या अंगठ्याने उजव्या नाकाचा भाग बंद करा. नंतर, डाव्या नाकाच्या भागाने श्वास घ्या. श्वास घेतल्यावर, उजव्या नाकाने श्वास सोडून द्या. आता डाव्या नाकाचा भाग बंद करा आणि उजव्या नाकाने श्वास घ्या. यानंतर, डाव्या नाकाने श्वास सोडा. श्वास आत घेणे आणि सोडणे हे काही वेळ करा. त्यानंतर हळूहळू 15 ते 30 मिनिटांपर्यंत ते करा. हा प्राणायाम श्वास आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो.
अनुलोम-विलोमचे फायदे
हृदयाचे आरोग्य: अनुलोम-विलोममुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. रक्तदाब नियंत्रणात राहणं हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्यामुळे हृदयाचे कार्य अधिक चांगले होते आणि हृदयविकाराच्या जोखमीपासून संरक्षण मिळते.
मानसिक ताण कमी होणे: दररोज अनुलोम-विलोम केल्याने मानसिक ताण कमी होतो. तणाव आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्यास त्याने मदत होते. त्यामुळे तुमच्या मनाची स्थिती शांत राहते. अंगी परिपक्वता येते.
पचनतंत्र सुधारते: अनुलोम-विलोम प्राणायाम पचनतंत्रासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे पचन सुधारते, गॅस, अपचन, पोट फुगणे, इत्यादी समस्या दूर होतात.
श्वासांशी संबंधित समस्यांवर कमी होणे: अनुलोम-विलोम प्राणायाम श्वास आणि श्वसन तंत्रासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे दमा, खोकला कमी होतो. हा प्राणायाम रोज केल्याने श्वासोच्छ्वासाच्या समस्या दूर होतात.
सर्दी आणि नाक जाम होणे: काही लोकांना सर्दीची समस्या असते. त्यांना नाक जाम होणे, नाकातून वास आणि गंध येणे अशा समस्या असतात. या समस्यांवर अनुलोम-विलोम प्राणायाम हा प्रभावी उपाय आहे. कारण हा प्राणायाम श्वासाच्या मार्गाला मोकळे ठेवतो आणि सर्दीमुळे होणारी नाक जाम होण्याची समस्या दूर करते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…