आरोग्य

पावसाळ्यात होणारे गंभीर आजार कोणते

१) श्वसनसंस्थेचे विषाणूजन्य आजार:- इंफ्लुएन्झा, न्युमोनिया, मेनिनजायटिस (मेंदूज्वर), स्वाईनफ्लू, कोरोना अशा आजारांच्या विषाणूंचे प्रमाण वाढते. या आजारात उद्भवणाऱ्या सर्दी, शिंका, खोकल्यामधून हे विषाणू पसरतात आणि त्यांच्या सानिध्यात असणाऱ्या इतर व्यक्तींच्या श्वासामधून त्यांच्या शरीरात जाऊन त्यांनाही या आजारांची लागण होते. तसेच दमा, जुना खोकला (ब्रॉन्कायटिस) असे आजार बळावतात.

२) डासांमधून पसरणारे आजार:- पावसाळ्यात सर्वत्र जमा होणाऱ्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. यामध्ये जास्त दिवस साचलेल्या दूषित पाण्यात अँनाफेलिस प्रजातीच्या दासांची पैदास वाढते. या डासांच्या चाव्यामधून मलेरिया होतो आणि त्याचा प्रसारही होतो. पावसाळ्यात घरामधील कुंड्या, फुलदाण्या, टेरेसवर ठेवलेले अडगळीचे सामान, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर यांच्यामध्ये असलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये एडिस इजिप्ती या डासांची पैदास होते. या डासांच्या चाव्यामधून डेंग्यू, चिकुनगुन्या, झिका या आजारांचा प्रसार होतो.

३) माश्यांपासून पसरणारे आजार:- पावसाळ्यात ओलेपणा, साचलेले सांडपाणी आणि अस्वच्छता यामुळे माश्या मोठ्या प्रमाणात वाढतात. माश्या बसलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब, टायफॉईड अशा आजारांचा प्रसार होतो.

४) पावसाचे साचलेले पाणी:- रस्त्यावर किंवा अन्यत्र साचलेल्या पाण्यात उंदीर, घोडे, गायी, बैल, म्हशी अशा प्राण्यांचे मूत्र पसरू शकते. या मूत्रामधून लेप्टोस्पायरोसिस नावाच्या आजाराचे विषाणू असतात. त्यामुळे अशा साचलेल्या पाण्यातून जाणाऱ्या व्यक्तीच्या पायावर कोणत्याही कारणामुळे जखम झालेली असेल, तर त्या जखमेमधून हे विषाणू त्याच्या शरीरात जातात आणि त्यांना लेप्टोस्पायरोसिसची लागण होते.

५) डोळे येणे:- पावसाळ्यामध्ये अनेकदा कंजन्क्टिव्हायटिस या आजाराचे विषाणू पसरून डोळ्यांची साथ येते. श्वसनसंस्थेमधून पसरणाऱ्या विषाणूजन्य सर्दीसारख्या आजारात देखील डोळे येणे, डोळे चुरचुरणे असे विकार होतात.

6) बुरशीजन्य आजार:- पावसाळ्यात भिजल्यावर अंग कोरडे न केल्यास किंवा ओले कपडे अंगावर वाळवल्यास, पावसाळ्यामुळे ण वाळलेली अर्धवट ओळी अंतर्वस्त्रे घातल्यास गजकर्णासारखे त्वचेचे बुरशीजन्य (फंगल) आजार होतात.पावसाळ्यात हातपाय सतत ओले राहिल्यास किंवा ते कोरडे न केल्यास हातापायांच्या बेचक्यांमध्येसुद्धा चिखल्यांसारखे त्वचेचे बुरशीजन्य आजार उद्भवतात.

आपल्या कुटुंबात किंवा आजुबाजूला कोणालाही अशाप्रकारची लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार करावेत. घरगुती उपाय करणे किंवा समस्या अंगावर काढल्याने त्रास वाढण्याचीच शक्यता जास्त असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

1 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

16 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

21 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

21 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

21 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

21 तास ago