आपला रोजचा दिनक्रम असा असावा की तो आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून सुदृढ बनवेल. आपला दिनक्रम आपल्याला उत्साही ठेवणारा, आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहित करणारा आणि आपल्या जीवनाचे संतुलन राखणारा असावा.
खाली एक आदर्श दिनक्रम दिला आहे
सकाळ
1) लवकर उठणे; सकाळी 5 ते 6 वाजता उठावे. लवकर उठल्याने दिवसभरासाठी वेळ मिळतो आणि मन प्रसन्न राहते.
2) ध्यान आणि योग; 15-30 मिनिटे ध्यान आणि योग करावे. यामुळे मनःशांती मिळते आणि शरीरातील ताणतणाव कमी होतो.
3) सकाळचा नाश्ता; पौष्टिक आणि संतुलित नाश्ता करावा. उदा. फळे, दुध, ओट्स, किंवा इडली-सांबर.
4) व्यायाम; 30-45 मिनिटे व्यायाम करावा. जसे की धावणे, सायकलिंग, किंवा जिममध्ये वर्कआउट करणे.
दुपार
1) कामाचे नियोजन; कामाचे व्यवस्थित नियोजन करावे. महत्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे.
2) मध्यान्ह भोजन; संतुलित आणि पौष्टिक अन्न ग्रहण करावे. उदा. भाजी, पोळी, डाळ, तांदूळ, आणि सलाड.
3) लघु विश्रांती; 10-15 मिनिटे विश्रांती घ्यावी. झोप येत असल्यास एक छोटी झोप घ्यावी.
संध्याकाळ
1) कामाचा आढावा; दिवसभराच्या कामाचा आढावा घ्यावा. काय पूर्ण झाले, काय बाकी आहे याचे विश्लेषण करावे.
2) हलका व्यायाम; संध्याकाळी हलका व्यायाम करावा, जसे की चालणे, स्ट्रेचिंग किंवा मेडिटेशन.
3) संध्याकाळचा नाश्ता- हलका आणि पौष्टिक नाश्ता करावा. उदा. फळे, नट्स किंवा हलका नाश्ता.
रात्री…
1) रात्रीचे भोजन; हलके आणि पचायला सोपे अन्न ग्रहण करावे. उदा. सूप, खिचडी, किंवा हलकी ज्वारीची भाकरी पोळी-भाजी.
2) कुटुंबासोबत वेळ; कुटुंबासोबत काही वेळ घालवावा, गप्पा माराव्या, किंवा एकत्र टीव्ही पाहावा.
3) वाचन; झोपण्यापूर्वी काही वेळ वाचन करावा. यामुळे मन शांतीत जाते आणि झोप उत्तम लागते.
4) झोपण्याची वेळ; नियमित झोपण्याची वेळ निश्चित करावी. रात्री 10 ते 11 वाजता झोपणे उत्तम.
इतर महत्वाच्या गोष्टी
1) पाणी पिणे; दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. कमीत कमी 8-10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
2) सकारात्मकता; दिवसभर सकारात्मक राहण्यासाठी प्रयत्न करावे. ताण-तणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा आवडीच्या गोष्टी कराव्यात.
3) स्वतःची काळजी; स्वतःची काळजी घ्यावी, वेळोवेळी तज्ञाचा सल्ला घ्यावा आणि आपल्या आरोग्यावर लक्ष द्यावे.
(सोशल मीडियावरून साभार)
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…