आरोग्य

कोणत्या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन करणं पडू शकतं महागात

रिकाम्या पोटी ज्या गोष्टींचं आपण सेवन करतो त्याचा थेट प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकतं. अशात न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी अशा काही फूड्सबाबत माहिती दिली आहे ज्यांचं रिकाम्या पोटी सेवन केल्याने समस्या होऊ शकतात.

रिकाम्या पोटी काय खाऊ नये 

कच्च्या भाज्या: न्यूट्रिशनिस्ट साक्षी यांच्यानुसार कच्च्या रिकाम्या पोटी खाणं टाळलं पाहिजे. कच्च्या भाज्यांमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. अशात रिकाम्या पोटी कच्च्या भाज्या खाल्ल्या तर पोट फुगणे, गॅस तयार होणे अशा समस्या होऊ शकतात.

योगर्ट: योगर्टही रिकाम्या पोटी काणं टाळलं पाहिजे. योगर्टमध्ये हेल्दी प्रोबायोटिक्स असतात, पण जर रिकाम्या पोटी याचं सेवन केलं तर पोटातील अ‍ॅसिड हे गुड प्रोबायोटिक्स नष्ट करतं. त्यामुळे योगर्ट रिकाम्या पोटी सेवन करू नये.

कॉफी: ब्लॅक कॉफी किंवा दुधाची कॉफी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटात अ‍ॅसिड वाढतं. यामुळे अ‍ॅसिडिटी, अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि हार्टबर्न या समस्या होऊ शकतात. त्याशिवाय पोटात अस्वस्थता सुद्धा जाणवते. त्यामुळे कॉफी रिकाम्या पोटी सेवन करू नये.

टोमॅटो: टोमॅटोमध्ये टॅनिन अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. जर टोमॅटो रिकाम्या पोटी खाल्लं तर याने पोटातील अ‍ॅसिड वाढतं आणि पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. अशात एक्सपर्ट टोमॅटो रिकाम्या पोटी न खाण्याचा सल्ला देतात.

केळ: केळीमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. जर केळ रिकाम्या पोटी खाल्लं तर याने शरीरात हे दोन्ही खनिज प्रमाणापेक्षा जास्त वाढतात. अशात शरीराचं संतुलन बिघडतं आणि हृदयासंबंधी समस्या वाढू लागतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…

16 तास ago

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…

17 तास ago

हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप

बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…

17 तास ago

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…

17 तास ago

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

1 दिवस ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

1 दिवस ago