आरोग्य

कोणत्या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन करणं पडू शकतं महागात

रिकाम्या पोटी ज्या गोष्टींचं आपण सेवन करतो त्याचा थेट प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकतं. अशात न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी अशा काही फूड्सबाबत माहिती दिली आहे ज्यांचं रिकाम्या पोटी सेवन केल्याने समस्या होऊ शकतात.

रिकाम्या पोटी काय खाऊ नये 

कच्च्या भाज्या: न्यूट्रिशनिस्ट साक्षी यांच्यानुसार कच्च्या रिकाम्या पोटी खाणं टाळलं पाहिजे. कच्च्या भाज्यांमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. अशात रिकाम्या पोटी कच्च्या भाज्या खाल्ल्या तर पोट फुगणे, गॅस तयार होणे अशा समस्या होऊ शकतात.

योगर्ट: योगर्टही रिकाम्या पोटी काणं टाळलं पाहिजे. योगर्टमध्ये हेल्दी प्रोबायोटिक्स असतात, पण जर रिकाम्या पोटी याचं सेवन केलं तर पोटातील अ‍ॅसिड हे गुड प्रोबायोटिक्स नष्ट करतं. त्यामुळे योगर्ट रिकाम्या पोटी सेवन करू नये.

कॉफी: ब्लॅक कॉफी किंवा दुधाची कॉफी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटात अ‍ॅसिड वाढतं. यामुळे अ‍ॅसिडिटी, अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि हार्टबर्न या समस्या होऊ शकतात. त्याशिवाय पोटात अस्वस्थता सुद्धा जाणवते. त्यामुळे कॉफी रिकाम्या पोटी सेवन करू नये.

टोमॅटो: टोमॅटोमध्ये टॅनिन अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. जर टोमॅटो रिकाम्या पोटी खाल्लं तर याने पोटातील अ‍ॅसिड वाढतं आणि पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. अशात एक्सपर्ट टोमॅटो रिकाम्या पोटी न खाण्याचा सल्ला देतात.

केळ: केळीमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. जर केळ रिकाम्या पोटी खाल्लं तर याने शरीरात हे दोन्ही खनिज प्रमाणापेक्षा जास्त वाढतात. अशात शरीराचं संतुलन बिघडतं आणि हृदयासंबंधी समस्या वाढू लागतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी; एकनाथ शिंदे

कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…

13 तास ago

पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन; सत्यजीत तांबे यांनी केला निर्णयाचे स्वागत

६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…

13 तास ago

घोडनदी बार असोसिएशनची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात; बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप

निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…

13 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे; सुनिल तटकरे यांच्याकडून नियुक्ती जाहीर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…

17 तास ago

म्हाडाच्या प्रलंबित प्रकल्पांना गती; मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…

17 तास ago

एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या महिला तलाठीवर पुन्हा लाचेचा गुन्हा; महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…

17 तास ago