आरोग्य

हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढतो?

हिवाळ्यात अधिक करून बॉडी टेम्प्रेचर कमी होतं. यामुळे सिम्पेथेटिक नर्वस सिस्टम अॅक्टिव होतं आणि कॅटेकोलामाइनचा स्त्राव वाढू शकतो. अशा स्थितीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढतो

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, ‘थंड हवामानामुळे हृदय आणि रक्ताभिसरणाच्या समस्यांचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची अधिक प्रकरणे दिसू शकतात. यासह रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. आणि कमजोर होतात. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या होत नाही.

हृदयरोग्यांसाठी सर्वोत्तम तापमान

डॉ. बिमल छाजेड यांनी मुलाखतीत सांगितले की, वैद्यकीय शास्त्रानुसार २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान सामान्य किंवा हृदयाच्या रुग्णांसाठी असते. थंडी वाढली की बाहेरची कामे, बाहेर जाणे, भेटणे कमी होते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. यासह वजन वाढणे, हाय ब्लड प्रेशर, यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्यास काय करावे

हिवाळ्यात शक्यतो सूर्यप्रकाश असताना चालावे. मॉर्निंग वॉक नेहमी रिकाम्या पोटी करावे. आपल्या आहारात सॅलडचा समावेश करावा. बाहेर जाणं टाळत असाल तर, योग किंवा व्यायाम करा. या गोष्टींची काळजी घेतल्यास रक्ताभिसरण वाढेल आणि शिरा आकसण्याचा धोका कमी होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

6 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

9 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

10 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

10 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

10 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

11 तास ago