हाडं आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असतात. कारण त्यांवरच तर आपलं शरीर टिकून आहे, उभं आहे. पण लोक तब्येत चांगली ठेवण्यासाठी जेवढी काळजी घेतात, तेवढी काळजी ते हाडांची घेताना दिसत नाहीत. यात एक आश्चर्याची बाब म्हणजे हाडं मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीच करण्याची किंवा वेगळा खर्च करण्याची सुद्धा गरज नसते. फ्रीमध्ये तुम्ही हाडं मजबूत करू शकता.
तुम्ही म्हणाल आजकाल फुकट काहीच मिळत नाही. पण असं काही नाहीये. तुम्ही हाडं मजबूत ठेवू शकता तेही फुकट. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतोय सूर्यकिरणांबाबत. सूर्यकिरणांच्या माध्यमातून तुम्ही व्हिटामिन डी मिळवू शकता. व्हिटामिन डी कॅल्शिअमसोबत मिक्स होऊन आपली हाडं निरोगी आणि मजबूत ठेवण्याचं काम करतं.
कशी काम करतात सूर्यकिरण
जेव्हा आपली त्वचा सूर्याच्या अल्ट्रावायलेट बी (UVB) किरणांच्या संपर्कात येते तेव्हा कोलेस्टेरॉलचा एक प्रकार व्हिटामिन डी मध्ये रूपांतरित होण्यास सुरूवात होते. या व्हिटामिन डी ला व्हिटामिन डी3 असंही म्हटलं जातं. नंतर ते लिव्हर आणि किडनीमध्ये सक्रिय होतं. हे व्हिटामिन डी हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं.
व्हिटामिन डी आणि कॅल्शिअमचं नातं
हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शिअम एक महत्वाचं तत्व आहे. पण जर शरीरात भरपूर व्हिटामिन डी नसेल तर शरीर कॅल्शिअमला योग्यपणे एब्जॉर्ब करू शकत नाही. व्हिटामिन डी छोट्या आतड्यांमध्ये कॅल्सिअमचं एब्जॉर्ब्शन वाढवतं.
ज्यानंतर ते ब्लड फ्लोमध्ये पोहोचतं. नंतर हे कॅल्शिअम हाडांमध्ये जमा होतं. त्यामुळे हाडं मजबूत ठेवण्यासाठी व्हिटामिन डी महत्वाचं ठरतं. जर ते कमी झालं तर हाडं कमजोर होतात आणि हाडांसंबंधी समस्यांचा धोका वाडतो.
किती फायदेशीर असत उन्ह
हाडं मजबूत ठेवण्यासाठी उन्ह घेण्याची योग्य वेळ महत्वाची ठरते. सामान्यपणे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेदरम्यानची वेळ उन्हाला व्हिटामिन डी च्या प्रोडक्शनसाठी सगळ्यात प्रभावी मानली जाते. कारण या दरम्यान UVB किरणं जास्त अॅक्टिव असतात. तसेच तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हातही काही वेळासाठी बसू शकता.
किती उन्ह घ्याव
रोज किमान 10 ते 30 मिनिटं उन्ह घेतलं पाहिजे. यापेक्षा जास्त वेळ उन्हात बसाल तर त्वचेचं नुकसानही होऊ शकतं. उन्हात बसले असताना तुम्ही सनस्क्रीन लावत असाल तर शरीराला व्हिटामिन डी पुरेसं मिळणार नाही. त्यामुळे थोडा वेळ सनस्क्रीन न लावता उन्हात बसावं.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…