महाराष्ट्र

4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी? 1 एप्रिल 2026 पासून नोकरीचे नियम बदलणार

औरंगाबाद: भारतातील कामगार वर्गासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार 1 एप्रिल 2026 पासून 29 जुने कायदे रद्द करून 4 नवीन कामगार संहिता (Labour Codes) लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे पगार, कामाचे तास आणि सुट्ट्यांचे गणित पूर्णपणे बदलणार आहे.

नवीन नियमांमधील मुख्य बदल काय आहेत

12 तासांची शिफ्ट

जर एखाद्या कंपनीत 12 तासांची शिफ्ट असेल, तर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करावे लागेल.

3 दिवसांची सुट्टी

4 दिवस काम केल्यास आठवड्यातून 3 दिवस पगारी सुट्टी मिळण्याची तरतूद आहे. मात्र, आठवड्याचे एकूण 48 तास पूर्ण करणे अनिवार्य असेल.

ओव्हरटाईमचे डबल पैसे

जर कर्मचाऱ्याने ठरवून दिलेल्या तासांपेक्षा जास्त काम केले, तर त्याला दुप्पट दराने ओव्हरटाईमचा पगार मिळेल.

बेसिक पगार आणि PF

नवीन नियमांनुसार, टेक-होम सॅलरी (हातात येणारा पगार) कमी होऊ शकतो, पण PF (भविष्य निर्वाह निधी) आणि ग्रॅच्युइटीमध्ये वाढ होईल, ज्यामुळे निवृत्तीनंतर अधिक पैसे मिळतील.

कर्मचाऱ्यांना मिळणारे विशेष फायदे

1) नियुक्ती पत्र अनिवार्य: प्रत्येक कर्मचाऱ्याला लेखी नियुक्ती पत्र (Appointment Letter) देणे आता कंपन्यांना बंधनकारक असेल.

2) मोफत आरोग्य तपासणी: ज्या कर्मचाऱ्यांचे वय 40 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांना वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणीची सुविधा मिळेल.

3) समान वेतन: समान कामासाठी समान वेतन या तत्त्वावर भर दिला जाईल. विशेषतः महिला आणि पुरुषांमधील वेतनातील तफावत दूर केली जाईल.

महिलांसाठी संधी: महिलांना त्यांच्या संमतीने रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी असेल, परंतु त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कंपनीची असेल.

4 नवीन कामगार संहिता कोणत्या

1. वेतन संहिता 2019 (Code on Wages)

2. औद्योगिक संबंध संहिता 2020 (Industrial Relations Code)

3. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 (Social Security Code)

4. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता 2020 (OSH Code)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

11 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

20 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

20 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

21 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago