महाराष्ट्र

निर्दोष नव्हे तर पुराव्यांच्या अभावी सोडण्यात आलेले आरोपी, मालेगाव निकालानंतर कॉंग्रेसचा घणाघात

मुंबई: मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा जवळपास 17 वर्षांनी निकाल लागला. पुराव्यांअभावी या प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचा निकाल लागला आहे. यानंतर एकीकडे महायुतीने कॉंग्रेसवर टीका केली असताना आता कॉंग्रेसनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एनआयएवर निशाणा साधला आहे. तसेच, दहशतवादाला जात धर्म नसतो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, मी त्यांना निर्दोष म्हणणार नाही तर त्यांना पुराव्यांच्या अभावी आरोपींना सोडण्यात आले आहे, असे म्हणत त्यांनी टीका केली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “मोटरसायकल ही एका व्यक्तीची आरोपीची होती, हे सिद्ध झाले आहे. पण पुरावे सादर करण्यात एनआयएला अपयश आलेले आहे. एनआयए हे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करते. ती एक संस्था असून गृह मंत्रालयाखाली काम करते. पुरावे सापडले की नाही हा वेगळा प्रश्न आहे. न्यायालयासमोर पुरावे सादर केले नाहीत. ” अशी शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली आहे. “न्यायालयाने म्हटले आहे की, एनआयए पुरावे सादर करू शकले नाही. आज 17 वर्ष खटला चाललेला आहे. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या एटीएसने हा खटला चालवला. महाराष्ट्राच्या पोलिसांनी या बॉम्ब स्फोटाबद्दल आरोपपत्र दाखल केले. आधी 17 जणांविरोधात नंतर 7 लोकांच्या विरोधात. मग महाराष्ट्र पोलीस सक्षम नाही का? त्यांनी मुद्दाम खोट्या केसेस दाखल केल्या का? हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले पाहिजे.” असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

भगवा शब्दाचा गैरवापर नको, तो रंग छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, संत तुकारामांचा आहे, संत ज्ञानेश्वरांचा आहे, असे यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “दहशतवादाला जात- धर्म नसतो. अशा प्रकरणांमध्ये राजकारण आणणे हे अत्यंत चुकीचे आहे. या प्रकरणात सर्व आरोपींन पुराव्यांभावी सोडण्यात आले आहे. मग मालेगावचा बॉम्बस्फोट केला कोणी?” असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. गुन्हेगारांचा शोध घेतलाच पाहिजे, हे सरकारचे अपयश असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. “पुरावा सादर करायची जबाबदारी आमची नाही किंवा जे कुटुंबीय त्या घटनेमध्ये वारलेल्या कुटुंबात त्या कुटुंबियांची जबाबदारी नाही. ही सरकारची जबाबदारी आहे. ही गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे की त्यांनी पुरावा सादर केला नाही,” असे पुन्हा एकदा त्यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

6 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

10 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

10 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

10 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

10 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

10 तास ago