महाराष्ट्र

अजित पवारांच्या मृत्यूला धक्कादायक वळण! ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास केला, तिलाच युरोपमध्ये बंदी

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या प्रकरणाला धक्कादायक आणि गंभीर वळण मिळाले आहे. ज्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या विमानाने अजित पवारांनी प्रवास केला होता, त्या कंपनीची आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

युरोपियन हवाई नियामक संस्था EASA (European Union Aviation Safety Agency) ने या कंपनीवर तब्बल एक वर्षापूर्वीच बंदी घातली होती. मात्र, एवढं असतानाही हीच कंपनी भारतात आणि महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी कशी काय अधिकृत राहिली, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.

काय आहे ‘लेव्हल 1’ सुरक्षा त्रुटी?

EASA च्या अहवालानुसार, ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीला ‘लेव्हल 1’ या सर्वात गंभीर श्रेणीतील सुरक्षा त्रुटी असलेल्या कंपन्यांच्या यादीत टाकण्यात आले होते. ‘लेव्हल 1’ म्हणजे संबंधित कंपनीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस हमी नाही किंवा ती तपास यंत्रणांशी सहकार्य करत नाही, असा थेट अर्थ होतो.

याच कारणामुळे कंपनीचा ‘थर्ड कंट्री ऑपरेटर’ (TCO) परवाना निलंबित करण्यात आला होता आणि युरोपियन हवाई क्षेत्रात उड्डाणांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली होती.

२०२३ चा अपघात लपवल्याचा आरोप

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत या कंपनीच्या ‘लिअरजेट ४५’ विमानाला अपघात झाला होता. मात्र, या अपघाताबाबतची तांत्रिक माहिती देण्यास कंपनीने टाळाटाळ केली.

ऑक्टोबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत EASA ने कंपनीला तब्बल ५ वेळा स्मरणपत्रं पाठवली. तरीही कंपनीने अंतर्गत चौकशी अहवाल सादर केला नाही. परिणामी, सुरक्षा नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत युरोपियन युनियनने कंपनीवर बंदी घातली.

धक्कादायक बाब म्हणजे, या बंदीचा अधिकृत आदेश भारताच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाला (DGCA) पाठवण्यात आला होता. तरीही भारतात ही कंपनी कशी कार्यरत राहिली, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तपास आता सीआयडीकडे

गेल्या आठवड्यात बारामतीजवळ कोसळलेले विमान हे देखील याच वादग्रस्त कंपनीचे होते. या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने तपासाची सूत्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवली आहेत. दरम्यान, केंद्रीय विमान अपघात तपास संस्थेने (AAIB) विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त केला असून, त्यातील डेटावरून अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण प्रकरणावर अद्याप DGCA कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र हा मुद्दा येत्या काळात मोठा राजकीय आणि प्रशासकीय वाद निर्माण करू शकतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

8 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

9 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

10 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

11 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

12 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

12 तास ago