महाराष्ट्र

अजित पवारांच्या मृत्यूला धक्कादायक वळण! ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास केला, तिलाच युरोपमध्ये बंदी

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या प्रकरणाला धक्कादायक आणि गंभीर वळण मिळाले आहे. ज्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या विमानाने अजित पवारांनी प्रवास केला होता, त्या कंपनीची आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

युरोपियन हवाई नियामक संस्था EASA (European Union Aviation Safety Agency) ने या कंपनीवर तब्बल एक वर्षापूर्वीच बंदी घातली होती. मात्र, एवढं असतानाही हीच कंपनी भारतात आणि महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी कशी काय अधिकृत राहिली, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.

काय आहे ‘लेव्हल 1’ सुरक्षा त्रुटी?

EASA च्या अहवालानुसार, ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीला ‘लेव्हल 1’ या सर्वात गंभीर श्रेणीतील सुरक्षा त्रुटी असलेल्या कंपन्यांच्या यादीत टाकण्यात आले होते. ‘लेव्हल 1’ म्हणजे संबंधित कंपनीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस हमी नाही किंवा ती तपास यंत्रणांशी सहकार्य करत नाही, असा थेट अर्थ होतो.

याच कारणामुळे कंपनीचा ‘थर्ड कंट्री ऑपरेटर’ (TCO) परवाना निलंबित करण्यात आला होता आणि युरोपियन हवाई क्षेत्रात उड्डाणांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली होती.

२०२३ चा अपघात लपवल्याचा आरोप

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत या कंपनीच्या ‘लिअरजेट ४५’ विमानाला अपघात झाला होता. मात्र, या अपघाताबाबतची तांत्रिक माहिती देण्यास कंपनीने टाळाटाळ केली.

ऑक्टोबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत EASA ने कंपनीला तब्बल ५ वेळा स्मरणपत्रं पाठवली. तरीही कंपनीने अंतर्गत चौकशी अहवाल सादर केला नाही. परिणामी, सुरक्षा नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत युरोपियन युनियनने कंपनीवर बंदी घातली.

धक्कादायक बाब म्हणजे, या बंदीचा अधिकृत आदेश भारताच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाला (DGCA) पाठवण्यात आला होता. तरीही भारतात ही कंपनी कशी कार्यरत राहिली, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तपास आता सीआयडीकडे

गेल्या आठवड्यात बारामतीजवळ कोसळलेले विमान हे देखील याच वादग्रस्त कंपनीचे होते. या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने तपासाची सूत्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवली आहेत. दरम्यान, केंद्रीय विमान अपघात तपास संस्थेने (AAIB) विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त केला असून, त्यातील डेटावरून अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण प्रकरणावर अद्याप DGCA कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र हा मुद्दा येत्या काळात मोठा राजकीय आणि प्रशासकीय वाद निर्माण करू शकतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

8 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

11 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

1 दिवस ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

2 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 दिवस ago