महाराष्ट्र

रेल्वेच्या सर्व डब्यात मेट्रोसारखे एसी असणार, तिकीटदरातही वाढ नाही; मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

मुंबई: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच मुंबई लोकल ट्रेनमध्ये मेट्रोसारखे एसी कोचेस उपलब्ध होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. प्रवाशांना या सुविधासाठी तिकीट दरात वाढ होणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या एसी कोचेसमध्ये बंद होणारे दरवाजे असतील. हे कोचेस पूर्णपणे नवे असतील, यात रेट्रोफिटिंग नसेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये फडणवीस बोलत होते.

मुंब्रा येथे मोठी रेल्वे दुर्घटना झाली होती. लोकल ट्रेनला दरवाजे नसल्याने अपघात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोक दाटीवाटीने प्रवास करत आहेत. आज दोन क्लास तयार करण्यात आले आहेत. मेट्रो ही पूर्णपणे वातानुकूलित आहे, शिवाय त्याचे दरवाजे बंद होतात. एसीमुळे प्रवाशांचा प्रवास सुखदायी होतो. एका बाजूला मेट्रो आहे, तर दुसऱ्या बाजूला लोकल रेल्वे आहे. लोक गर्दीत प्रवास करतात, लोकल ट्रेनच्या डब्यांना दरवाजे नसल्याने अपघात होतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे लोकल रेल्वेमधील सुधारणेसाठी मागणी केली आहे. रेल्वेला मेट्रोसारखे एसी कोचेस मिळावेत. एसी कोचेसना बंद होणार दरवाजे असावेत. यामुळे तिकीटदरात एका रुपयाचीही वाढ होऊ नये अशी मागणी आम्ही केली आहे. याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लवकरच मुंबईतील लोकल रेल्वेचे डबे मेट्रोसारखे वातानुकूलित असतील हे डबे रेट्रोफिटिंग नसून नवे डबे असतील. उत्कृष्ट पद्धतीचे हे डबे, कोचेस असतील. आगामी काळात लोकल ट्रेनला बंद होणारे दरवाजे असतील. पण तिकिटात कोणत्याही प्रकारची दरवाढ होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. याशिवाय त्यांनी मेट्रो प्रकल्पांवरही भाष्य केले आहे. कुलाबा ते आरे मार्ग ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस पूर्णतः कार्यान्वित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विक्रोळी-मंडाले आणि ठाणे-कल्याणसह १३ मेट्रो मार्गांवर काम वेगाने सुरू आहे. एकात्मिक तिकीट प्रणालीही लवकरच लागू होणार आहे. या प्रणालीमुळे एकाच तिकीटावर मेट्रो, लोकल, मोनो, बेस्ट आणि जलवाहतूक या सर्व सेवा वापरता येणार आहेत. हे तिकीट व्हॉट्सअ‍ॅपवरही उपलब्ध होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

2 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

2 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

7 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

7 तास ago