नागपूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेतील लाखो महिलांना अपात्र ठरवून महायुती सरकारने त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते Vijay Wadettiwar यांनी केला. या महिलांच्या नाराजीचा फटका आगामी काळात महायुती सरकारला बसणार असल्याची टीकाही त्यांनी केली.
वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीत मतांसाठी लाडकी बहिण योजनेचा वापर करण्यात आला. मात्र सत्ता मिळाल्यानंतर सरकारनेच या महिलांना वाऱ्यावर सोडले आहे. सुमारे ८० लाख महिलांना अपात्र ठरवून सरकारने आपली जबाबदारी झटकली असून, यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवर भाष्य करताना त्यांनी भाजपवर स्थानिक कार्यकर्त्यांपेक्षा उद्योगपतींना प्राधान्य दिल्याचा आरोप केला. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले.
“काँग्रेसमुक्त भारत”चा नारा देणारी भाजप आता “काँग्रेसयुक्त” होत चालली असल्याचा उपरोधिक टोला वडेट्टीवार यांनी लगावला. अनेक मुख्यमंत्री, आमदार आणि आता विधान परिषदेचे उमेदवारही काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपची मूळ ओळख बदलत असल्याची टीका त्यांनी केली.
विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेस सर्व जागांवर ताकदीने लढणार असल्याचे सांगत त्यांनी पक्षाचे उमेदवार निश्चित झाल्याचे स्पष्ट केले. भाजपकडे संख्याबळ असूनही उमेदवारांची घोषणा करण्यास झालेला विलंब त्यांच्या मनातील भीती दर्शवितो, असा दावा त्यांनी केला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असल्यास घटना दुरुस्तीला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. ५० टक्क्यांवरील आरक्षणाच्या मर्यादेचा आधार घेत ओबीसी आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सरकारच्या ओबीसीविरोधी भूमिकेचे द्योतक असल्याचेही त्यांनी 🥰म्हटले.
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…
मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…
जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…