नागपूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेतील लाखो महिलांना अपात्र ठरवून महायुती सरकारने त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते Vijay Wadettiwar यांनी केला. या महिलांच्या नाराजीचा फटका आगामी काळात महायुती सरकारला बसणार असल्याची टीकाही त्यांनी केली.
वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीत मतांसाठी लाडकी बहिण योजनेचा वापर करण्यात आला. मात्र सत्ता मिळाल्यानंतर सरकारनेच या महिलांना वाऱ्यावर सोडले आहे. सुमारे ८० लाख महिलांना अपात्र ठरवून सरकारने आपली जबाबदारी झटकली असून, यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवर भाष्य करताना त्यांनी भाजपवर स्थानिक कार्यकर्त्यांपेक्षा उद्योगपतींना प्राधान्य दिल्याचा आरोप केला. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले.
“काँग्रेसमुक्त भारत”चा नारा देणारी भाजप आता “काँग्रेसयुक्त” होत चालली असल्याचा उपरोधिक टोला वडेट्टीवार यांनी लगावला. अनेक मुख्यमंत्री, आमदार आणि आता विधान परिषदेचे उमेदवारही काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपची मूळ ओळख बदलत असल्याची टीका त्यांनी केली.
विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेस सर्व जागांवर ताकदीने लढणार असल्याचे सांगत त्यांनी पक्षाचे उमेदवार निश्चित झाल्याचे स्पष्ट केले. भाजपकडे संख्याबळ असूनही उमेदवारांची घोषणा करण्यास झालेला विलंब त्यांच्या मनातील भीती दर्शवितो, असा दावा त्यांनी केला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असल्यास घटना दुरुस्तीला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. ५० टक्क्यांवरील आरक्षणाच्या मर्यादेचा आधार घेत ओबीसी आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सरकारच्या ओबीसीविरोधी भूमिकेचे द्योतक असल्याचेही त्यांनी 🥰म्हटले.
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…
छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…