महाराष्ट्र

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतातील सुवर्ण पर्वाचा अस्त

मुंबई: ज्येष्ठ गायिका Suman Kalyanpur यांच्या निधनाने संगीत विश्वातील एक दैदिप्यमान सुवर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, स्वरांमधून भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद लाभलेला एक अमूल्य आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत, बालगीत तसेच हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांनी अजरामर ठसा उमटवला. त्यांच्या सुरेल आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध केले असून जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयात त्यांनी कायमचे स्थान निर्माण केले.

साधेपणा, नम्रता आणि संगीताप्रती असलेली त्यांची निष्ठा हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे नमूद करत, त्यांच्या कुटुंबीयांना व असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

4 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

9 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

9 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

10 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

10 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

11 तास ago