मुंबई: ज्येष्ठ गायिका Suman Kalyanpur यांच्या निधनाने संगीत विश्वातील एक दैदिप्यमान सुवर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, स्वरांमधून भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद लाभलेला एक अमूल्य आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत, बालगीत तसेच हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांनी अजरामर ठसा उमटवला. त्यांच्या सुरेल आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध केले असून जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयात त्यांनी कायमचे स्थान निर्माण केले.
साधेपणा, नम्रता आणि संगीताप्रती असलेली त्यांची निष्ठा हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे नमूद करत, त्यांच्या कुटुंबीयांना व असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…
परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…
पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…
निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…