मुंबई: ज्येष्ठ गायिका Suman Kalyanpur यांच्या निधनाने संगीत विश्वातील एक दैदिप्यमान सुवर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, स्वरांमधून भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद लाभलेला एक अमूल्य आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत, बालगीत तसेच हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांनी अजरामर ठसा उमटवला. त्यांच्या सुरेल आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध केले असून जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयात त्यांनी कायमचे स्थान निर्माण केले.
साधेपणा, नम्रता आणि संगीताप्रती असलेली त्यांची निष्ठा हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे नमूद करत, त्यांच्या कुटुंबीयांना व असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…
छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…