महाराष्ट्र

चव्हाण सेंटरच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषद २०२५ चे आयोजन

मुंबई: दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी “दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषद” यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद होत असून या परिषदेस त्या उपस्थित राहणार आहेत. ही परिषद शुक्रवार, (दि. २८) फेब्रुवारी २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे.

या परिषदेचे उद्दिष्ट दिव्यांगांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित धोरणे, कायदे आणि योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि चर्चा करणे आहे. कल्याणकारी योजनांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रक्रिया सुलभ करणे, सेवा वितरणात सुधारणा करणे आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये आपली बाजू मांडणे हे या परिषदेचे प्रमुख विषय आहेत.

या परिषदेत महाराष्ट्र शासनातील विविध विभागातील अधिकारी, शाळा, आरोग्य, रुग्णालय, शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, दिव्यांगांसाठी संस्था, संघटना सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम मोफत असून पूर्वनोंदणीसाठी गुगल फॉर्म https://chavancentre.org/ वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ९८६७१ ५५३४५ या नंबरवर संपर्क करू शकता. या परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

30 मिनिटे ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

35 मिनिटे ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

50 मिनिटे ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

57 मिनिटे ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

59 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago