महाराष्ट्र

इंडिया ऑल इम्पॅक्ट सुममित मध्ये गोंधळ; एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर टीका

मुंबई: भारताचे तंत्रवैभव जगासमोर मांडले जात असताना भारत मंडपम येथे युथ काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली.

इंडिया ऑल इम्पॅक्ट सुममित च्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रकाराला त्यांनी “देशप्रेम नव्हे, तर देशद्रोह” असे संबोधले. काँग्रेसने आणि त्यांच्या नेत्यांनी देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

‘एक्स’वरील पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भारत-अमेरिका कराराला विरोध असेल तर काँग्रेसने सैद्धांतिक भूमिका मांडावी. मात्र भारत मंडपममध्ये गोंधळ घालत, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून विदेशी पाहुण्यांसमोर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

परदेशात जाऊन भारताविषयी अपप्रचार करणारे राहुल गांधी यांच्यासारखे नेते असताना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार, असा टोला देखील शिंदे यांनी लगावला.

शिवसेनेचे काँग्रेसविरोधात आंदोलन

दरम्यान, शनिवारी दुपारी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे शिवसेनेच्या वतीने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. “राहुल गांधी मुर्दाबाद”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या आंदोलनात माजी महापौर दत्ता दळवी, माजी नगरसेवक कमलेश राय, शिवसेना सचिव व चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार, माजी नगरसेवक राजू पेडणेकर, दिलीप नाईक, विभागप्रमुख गणेश सानप, निलम पवार तसेच महिला आघाडी, युवती सेना आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.काँग्रेस देशद्रोही आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शैनाज NC यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

3 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

3 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

3 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

3 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

14 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

18 तास ago