मणिकर्णिका घाटावरील तोडफोडीची करणार पाहणी
मुंबई: मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या पवित्र मणिकर्णिका घाटाची बुलडोझरद्वारे तोडफोड केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या कारवाईत घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंग उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या सोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, तसेच काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हे शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटाला भेट देऊन झालेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे.
मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला घाट आहे. मात्र ‘विकास’ या नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यापूर्वीही काशी परिसरात अनेक मंदिरे पाडण्यात आल्याचे आरोप करण्यात आले असून, आता मणिकर्णिका घाट, तेथील देवी-देवतांच्या मूर्ती आणि लहान मंदिरे उद्ध्वस्त करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अपमान करण्यात आल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे.
हा प्रकार केवळ अहिल्याबाई होळकर यांच्या वारशाचा अपमान नसून, धनगर समाजासह संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेवर आघात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सरकारचे हे कृत्य म्हणजे संस्कृती, परंपरा आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…