शिरूर: रांजणगाव एमआयडीसीमुळे शिरूर तालुक्यात गुंतवणूक आणि रोजगाराचे दार उघडले, मात्र त्याची किंमत आता शेतकरी आणि सामान्य नागरिकांना जीवावर येण्यासारखी मोजावी लागत आहे. रासायनिक प्रदूषणामुळे ओढ्यांचे पाणी दूषित होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून या पाण्याचा थेट फटका गावातील पिकांना आणि आरोग्याला बसत आहे.
पिकांचे नुकसान, जमिनीची सुपीकता कमी होणे, जनावरांवर परिणाम अशा अनेक अंगांनी या प्रदूषणाने गावकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. शिरूर तालुक्यातील काही युवकांना रोजगार मिळाला आहे, पण प्रदूषण संपूर्ण तालुक्याला मिळत आहे, असा रोखठोक सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. कंपन्या उघड उघड रासायनिक कचरा बाहेर टाकत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमके कोणाच्या बाजूने उभे आहे? असा थेट राजकीय प्रश्न आता चर्चेत आहे. नियम तोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई न करणे आणि अधिकारी मौन धारण करणे याबद्दल स्थानिकांमध्ये संताप आहे.
प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर आणि कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन उभे केले जाईल आणि जबाबदारी प्रशासनाची असेल. स्थानिक राजकीय पातळीवरही हा प्रश्न भडकल्याची चिन्हे सुरू झाली आहेत. काही नेत्यांनी प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीत घेऊन जाण्याच्या हालचाली सुरू केल्याचे बोलले जाते.
अनेक कंपन्या थेट रसायने बाहेर फेकत असताना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमके काय करत आहे, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणीही पुढे आली आहे. कंपन्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई आणि निरीक्षण यंत्रणा मजबूत करण्याची मागणी होऊनही ठोस कृती होत नसल्याने आंदोलनाची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. कंपन्यांवर कारवाई केली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक…
MEPL कंपनीच्या पाण्यामुळे शेती नापीक झाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
रांजणगाव येथील जल प्रदुषण करणाऱ्या MEPL कंपनीवर बंदी आणा खासदार डॉ अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी
रांजणगाव MIDC तील MEPL कंपनीच्या दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांची उद्योगमंत्र्याकडे धाव
MEPL कंपनीबाबत येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडावा शेखर पाचुंदकर यांची दिलीप वळसेंकडे मागणी
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…
पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सर्वसाधारण प्रवर्गातील…