महाराष्ट्र

दादांची कमी कधीच भरून निघणार नाही, पण सुनेत्रा वहिनींनी शिवधनुष्य उचलल; अमोल मिटकरी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीसह त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर एबीपी माझाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “दादांची कमी कधीच भरून निघणार नाही. आमच्यासारखे अनेक लोक वाट बघत होते. पण सुनेत्रा वहिनींनी शिवधनुष्य उचललं आहे. आज आम्ही दादांना खूप मिस केलं.”

या शपथविधीवर ‘एवढी घाई कशासाठी?’ अशी टीका होत असताना, त्यावर उत्तर देताना मिटकरी म्हणाले, “शेवटी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला निर्णय आहे. पार्लमेंटरी बोर्डात जो निर्णय झाला आहे, तो आम्हाला आमदार म्हणून पाळावाच लागतो. लोक काय टीका-टिप्पणी करतात यापेक्षा पक्ष सांभाळणं महत्त्वाचं आहे.”

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “या दुःखाच्या क्षणी सर्वांना सावरणं अत्यंत गरजेचं होतं. पक्ष, कार्यकर्ते आणि समर्थकांना एकत्र ठेवण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी अत्यंत जड अंतःकरणाने हा निर्णय घेतलेला आहे.”

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणासंदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर बोलताना मिटकरी म्हणाले, “विलिनीकरणाच्या चर्चा अनेकदा झाल्या आहेत. दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. मी त्यावर बोलण्याइतका मोठा नाही.”

मिटकरी पुढे म्हणाले, “पक्ष एकत्र असायलाच हवा. साहेब आणि आम्ही एकत्र असायलाच हवे. पक्ष एकत्र नसेल, तर दुसरे लोक घुसखोरी करतात. स्वराज्य दुर्लक्षित झालं, तर दुसरेच येऊन राज्य करतात.”

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील दिशा काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

5 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

8 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

1 दिवस ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 दिवस ago