महाराष्ट्र

दादांची कमी कधीच भरून निघणार नाही, पण सुनेत्रा वहिनींनी शिवधनुष्य उचलल; अमोल मिटकरी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीसह त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर एबीपी माझाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “दादांची कमी कधीच भरून निघणार नाही. आमच्यासारखे अनेक लोक वाट बघत होते. पण सुनेत्रा वहिनींनी शिवधनुष्य उचललं आहे. आज आम्ही दादांना खूप मिस केलं.”

या शपथविधीवर ‘एवढी घाई कशासाठी?’ अशी टीका होत असताना, त्यावर उत्तर देताना मिटकरी म्हणाले, “शेवटी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला निर्णय आहे. पार्लमेंटरी बोर्डात जो निर्णय झाला आहे, तो आम्हाला आमदार म्हणून पाळावाच लागतो. लोक काय टीका-टिप्पणी करतात यापेक्षा पक्ष सांभाळणं महत्त्वाचं आहे.”

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “या दुःखाच्या क्षणी सर्वांना सावरणं अत्यंत गरजेचं होतं. पक्ष, कार्यकर्ते आणि समर्थकांना एकत्र ठेवण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी अत्यंत जड अंतःकरणाने हा निर्णय घेतलेला आहे.”

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणासंदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर बोलताना मिटकरी म्हणाले, “विलिनीकरणाच्या चर्चा अनेकदा झाल्या आहेत. दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. मी त्यावर बोलण्याइतका मोठा नाही.”

मिटकरी पुढे म्हणाले, “पक्ष एकत्र असायलाच हवा. साहेब आणि आम्ही एकत्र असायलाच हवे. पक्ष एकत्र नसेल, तर दुसरे लोक घुसखोरी करतात. स्वराज्य दुर्लक्षित झालं, तर दुसरेच येऊन राज्य करतात.”

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील दिशा काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महिला सेनेचा ‘शिवदुर्गा-शिवसंवाद’ दौरा १५ जूनपासून

११ जिल्ह्यांतील ८३ मतदारसंघांचा संघटनात्मक आढावा मुंबई: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर…

2 सेकंद ago

नटराजन यांची नोटीसच रद्द! राज्यसभा निवडणूक पुन्हा घ्या, भाजपावर ‘सीटचोरी’चा आरोप

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द…

3 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…

21 तास ago

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…

21 तास ago

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

1 दिवस ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

1 दिवस ago