महाराष्ट्र

आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा व्हिडीओ कॉलद्वारे संवाद

२०१ जोडप्यांना दिल्या शुभेच्छा

बोईसर: शिवसेनेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याला यंदा उपमुख्यमंत्री Eknath Shinde प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे नववधू-वरांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.

बोईसरमधील शिवसेना आदिवासी समाज विभाग आणि आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावर्षी तब्बल २०१ आदिवासी जोडप्यांचा विवाह या सोहळ्यात संपन्न झाला.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व नवरी-नवरदेवांनी सुख, समाधान आणि आनंदाने नव्या आयुष्याची सुरुवात करावी, हीच माझी शुभेच्छा आहे. मला प्रत्यक्ष उपस्थित राहून तुम्हा सर्वांना भेटायचे होते, मात्र काही कारणास्तव नियोजित दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे मी व्हिडीओ कॉलद्वारे तुमच्याशी संवाद साधत आहे.”

“मंडपातील सर्व नववधू या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे हा माझ्या घरातीलच विवाह सोहळा आहे,” असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिवसेना उपनेते तथा आदिवासी समाज महाराष्ट्र संघटक आणि आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश धोडी, सहसंपर्क प्रमुख वैभव संखे तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांचे आयोजन करणे हे शिवसेनेच्या संस्कारात असल्याचे सांगताना शिंदे म्हणाले की, “लग्नासाठी अनेक गरीब कुटुंबांना कर्ज काढावे लागते, जमीन गहाण ठेवावी लागते. अशा परिस्थितीत सामूहिक विवाह सोहळा ही मोठी मदत ठरते. या सोहळ्यात जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य देऊन कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांचे लग्न लावून दिले जाते, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.”

जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासियांना काटकसरीचे आवाहन केले असल्याचे नमूद करत, “हा सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे त्या आवाहनाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद आहे. हा केवळ विवाह सोहळा नसून सामाजिक एकात्मतेचे मोठे उदाहरण आहे,” असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपनेते जगदीश धोडी यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. २०२३ मध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आदिवासी कन्यादान योजनेतील निधी १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला होता. त्या निर्णयाचा लाभ अनेक आदिवासी महिलांना होत असल्याचे धोडी यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वाघाळे येथून भक्तिमय वातावरणात न्यू वाघेश्वर दिंडीचे आषाढी वारीसाठी प्रस्थान…

शिरूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघाळे…

14 तास ago

‘अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या’; मुख्यमंत्री फडणवीसांकडे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचे निवेदन; महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे तातडीने शिफारस पाठवावी, अशी मागणी…

14 तास ago

एक तालुका – एक क्लस्टर’ योजनेला ब्रेक; राज्यातील १९१ तालुके अजूनही औद्योगिक विकासापासून वंचित; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील 'एक तालुका – एक क्लस्टर' योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याने महाराष्ट्रातील ३५५…

14 तास ago

पोलीस भरतीला वार्षिक कॅलेंडरची दिशा; सत्यजीत तांबे यांच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन मुंबई: राज्यातील लाखो…

14 तास ago

दादागिरी, खंडणी आणि धमक्यांना शून्य सहनशीलता; तक्रार करा, कठोर कारवाई करू – पीआय चंद्रशेखर यादव

शिक्रापूर पोलिसांची व्यापाऱ्यांसोबत समन्वय बैठक; वाहतूक, अतिक्रमण, पार्किंगसह सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन शिक्रापूर (अक्षय टेमगिरे):…

18 तास ago

कॅमेऱ्यासमोरील बडबड सोडा, मैदानात उतरून कर्तृत्व दाखवा; विरोधकांवर शिवसेनेचा निशाणा

मुंबई: विरोधकांनी कॅमेऱ्यांसमोर आक्रमक आणि अर्वाच्य भाषा वापरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे…

18 तास ago