महाराष्ट्र

लातूर जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: लातूर जिल्ह्यातील पीक विमा न मिळालेल्या तसेच अर्ज अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. पिक विमा कंपन्यांसोबतच्या करारात आवश्यक बदल करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. विमा नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांना योजनांच्या अटी, नियम व प्रक्रियेची सविस्तर माहिती देऊन योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अर्ज क्रमांकाचा वापर https://agriwelfare.gov.in या संकेतस्थळावर विमा दाव्याच्या स्थितीबाबत माहिती मिळवण्यासाठी करावा, असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांशी थेट संपर्क साधून अधिक माहिती मिळवावी यासाठी यंत्रणांनी जागृती करावी, असेही निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

या बैठकीत कृषी संचालक विजयकुमार आवटे यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, एकूण ७ हजार ६०० कोटी रुपयांच्या विमा योजनेत १ कोटी ६८ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यात ३ हजार कोटी केंद्र सरकारचा तर ४ हजार ५०० कोटी राज्य सरकारचा हिस्सा होता. आतापर्यंत ३ हजार ५२१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. केंद्र शासनाचा टोल फ्री क्रमांक १४६७४ असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बैठकीस कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी उपसचिव प्रतिभा पाटील, SBI जनरल इनशुअरन्सचे श्री. त्र्यंबकेश्वर तिवारी व श्री. ढोणे, अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, मराठवाडा विभाग शिवसेना सचिव अशोक पटवर्धन, आणि शेतकरी प्रतिनिधी शिवाजी माने उपस्थित होते.

बैठकीत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्टपणे नमूद केले की, शासन, विमा कंपन्या, शेतकरी आणि प्रशासन हे चारही घटक एकत्रितपणे काम केल्यासच शेतकऱ्यांच्या समस्या सुटू शकतात. अनेक वेळा प्रशासनाकडे अचूक नोंद नसल्यामुळे किंवा हवामानाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान योग्य प्रकारे नोंदवले जात नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील अधिकारी आपले अधिकार वापरून निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या योजनेचा लाभ संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी राज्यस्तरीय प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीतून एकूण निष्कर्ष असा निघाला की, शेतकऱ्यांच्या समस्यांचा सर्वसमावेशक आढावा घेऊन धोरणात्मक निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत विशेष जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी आणि पात्र लाभार्थ्यांना योग्य वेळी मदत पोहोचवावी.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

13 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

18 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

18 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

18 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

18 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

20 तास ago