महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता ‘मिशन मोड’वर

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक निर्देश

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करत आहे.. विशेषतः लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या (DBATU) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ठोस पावले उचलली आहेत.

बाटु विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक आणि गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी,संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या आहेत. तसेच या सर्व कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे अनेक महाविद्यालये व संस्थाचालकांनी विद्यापीठापासून विसंलग्निकरणाचीही मागणी केली आहे. या सर्व शैक्षणिक बाबींची विचार करून प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश देऊन परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता ‘मिशन मोड’वर मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

नव्या नेतृत्वावर मोठी जबाबदारी

परीक्षा सुधारणांचा दांडगा अनुभव असलेल्या प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती विद्यापीठात करण्यात आली आहे. राजेश अग्रवाल समितीसह विविध शासकीय समित्यांवर काम केलेले आहे.या अनुभवातून प्रभारी कुलगुरूंनी पुढील ३ ते ६ महिन्यांत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे आणि विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहेत.

विद्यापीठाच्य प्रशासकीय सुधारणा करण्याचे शासनाचे ‘व्हिजन’

निकाल प्रक्रिया कालबद्ध करण्यासाठीपरीक्षा वेळेत घेऊन निकाल विहित मुदतीत जाहीर करण्याला सर्वोच्च प्राधान्य

एआय (AI) सक्षम महाविद्यालये: विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सज्ज करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

सेंटर्स ऑफ एक्सलन्स (Centers of Excellence): सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे उत्कृष्टता केंद्रे उभारली जातील. यासाठी CSR निधी आणि शासकीय अनुदानातून तरतूद केली जाणार आहे.तसेच प्रभारी कुलगुरूंना परीक्षा आणि निकाल प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी स्पष्ट आणि कडक सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे हित राज्य शासनाचे सर्वोपरी असून, शैक्षणिक नियोजन सुस्थितीत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परीक्षा व निकाल प्रक्रिया सुरळीत सुरू झाली की विसंलग्निकरणाचा प्रश्नच उद्भवणार नाही, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

16 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

17 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

21 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago