आरोग्य

तुमच्या हातांचे तापमान उबदार वा थंड कोणते हात चांगले घ्या जाणून…

आपल्या हातांचे तापमान आपल्या आतड्याच्या आरोग्याबद्दल अप्रत्यक्ष, परंतु अर्थपूर्ण माहिती देऊ शकते. विशेषतः रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेच्या संतुलनावर त्याचा प्रभाव पडतो.

उदाहरणार्थ

प्राण्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आतड्यांतील जीवाणूंमध्ये येणारे व्यत्यय – जसे की अँटीबायोटिक वापरामुळे – शरीराच्या तापमानात मोजता येण्याजोगी घट होऊ शकते. हे संशोधन प्रामुख्याने अंतर्गत तापमान नियमनावर लक्ष केंद्रित करीत असले तरी हातपायांची उष्णता किंवा थंडपणा हे शारीरिक स्थितींचे बाह्य प्रकटीकरण असू शकते, ज्यामध्ये आतड्याच्या आरोग्याशी संबंधित स्थितींचा समावेश आहे.

उबदार की थंड हात कोणते चांगले 

सतत उबदार हात हे सामान्यतः चांगले लक्षण आहे. ते रक्ताभिसरण आणि स्वायत्त मज्जासंस्थेचे लक्षण मानले जाते. हे सर्व निरोगी आतड्यांमुळे प्रभावित होते.

दुसरीकडे सतत थंड हात असणे म्हणजे खराब रक्त प्रवाह, वाढलेला ताण प्रतिसाद किंवा चयापचय विकार दर्शवू शकतात. अशा परिस्थितीत आतड्यांमधील असंतुलन वाढू शकते. हाताच्या तापमानाकडे कधी कधी उर्जेच्या प्रवाहाचे आणि भावनिक स्थितीचे प्रतिबिंब म्हणून पाहिले जाते. थंड हात भावनिक आकुंचन किंवा मज्जासंस्थेचा अतिरेक दर्शवू शकतात आणि उबदार हात मोकळेपणा, चैतन्य व संतुलन दर्शवू शकतात.

हातांचे तापमान पचनाच्या समस्यांशी संबंधित असल्याचे म्हटले जात असले तरी ते इतर विविध कारणांमुळे देखील असू शकते.

१) थंड हात

ते रक्ताभिसरण बिघडलेले किंवा थायरॉईड फंक्शनसारख्या समस्या दर्शवू शकतात.

२) गरम हात

उबदार, लालसर त्वचा पचनाच्या समस्यांशी संबंधित असू शकते. हे इतर आरोग्य परिस्थितींमुळेदेखील होऊ शकते. इतर कारणांमध्ये उदा. उबदार हवामान, व्यायाम व उच्च रक्तदाब यांचा समावेश आहे.

३) घाम येणारे हात

हा हायपरहायड्रोसिस नावाचा आजार आहे, जो घामाच्या ग्रंथींच्या अतिक्रियाशीलतेमुळे होतो. मधुमेह आणि थायरॉईड विकार किंवा काही औषधे घेतल्यानेदेखील हा आजार होऊ शकतो.

४) तळहातांना कोरडेपणा व खाज सुटणे

बद्धकोष्ठता, पोटफुगी व अतिसार यांसारख्या आतड्यांशी संबंधित समस्यांमुळे तुमच्या तळहातांना कोरडेपणा व खाज येऊ शकते. हे यकृताचे आजार, थायरॉईड विकार, त्वचेची अॅलर्जी किंवा संसर्गामुळेदेखील होऊ शकते.

हाताचे तापमान हे केवळ आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित नसले तरी तो एक संकेत आहे. विशेषतः जेव्हा पचनक्रिया बिघडते, थकवा किंवा तणाव येतो. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

6 तास ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

6 तास ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

6 तास ago

महिला आरक्षण विधेयकावरून देशात राजकीय गदारोळ

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…

6 तास ago

वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…

9 तास ago

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…

9 तास ago