महाराष्ट्र

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकरी संकटात; मोशी दुर्घटनेतील जबाबदारांवर कारवाईची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन महत्त्वाच्या जनहिताच्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले. विदर्भातील निकृष्ट व बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा मुद्दा उपस्थित करत दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली.

अकोला, अमरावतीसह विदर्भातील अनेक भागांत सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नसल्याच्या शेकडो तक्रारी समोर आल्या आहेत. अकोला जिल्ह्यातच २०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून सुमारे २५ हजार हेक्टरवरील पेरणी प्रभावित झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

या प्रकरणाची दखल घेत कृषिमंत्र्यांनी विधानसभेत संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांची तपासणी सुरू असल्याचे सांगितले. बियाणे नियंत्रण कायद्यानुसार दोषी आढळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून त्यांचे बियाणे विक्री परवाने रद्द करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली.

दरम्यान, ८ जुलै रोजी पिंपरी-चिंचवडच्या मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मोशी डेपो हा शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रमुख केंद्रबिंदू असून वाढत्या कचऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

फडणवीसांचा ‘जेन-झी संवाद’ सुपरफ्लॉप; सपकाळांचा घणाघात, ‘कॉपी-पेस्टही करता येत नाही!’

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील ‘जेन-झी संवाद’ कार्यक्रमावर जोरदार…

11 तास ago

नाशिकमध्ये काँग्रेसचे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर; राहुल गांधी करणार विशेष मार्गदर्शन

मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

11 तास ago

शरीराच्या सर्व नसा उघडण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

कापूर आणि लिंबू किती उपयुक्त आहेत. दिवसातून एकदा तरी हा सोपा उपाय करून पहा, तुम्हाला…

22 तास ago

दररोज भरभर चालण्याचे असे होतात फायदे

सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोगा चल पद्धतीचा चांगला व्यायाम कोणता, असं जर आरोग्यतज्ज्ञांना विचारलं…

22 तास ago

मुंबई महापालिकेचे रुग्णालय की ‘रेफरल सेंटर’? राष्ट्रवादीकडून आरोग्य विभागावर गंभीर आरोप

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून, महापालिका रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी…

22 तास ago

मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राहुल गांधींकडे साद

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की…

22 तास ago