महाराष्ट्र

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकरी संकटात; मोशी दुर्घटनेतील जबाबदारांवर कारवाईची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन महत्त्वाच्या जनहिताच्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले. विदर्भातील निकृष्ट व बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा मुद्दा उपस्थित करत दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली.

अकोला, अमरावतीसह विदर्भातील अनेक भागांत सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नसल्याच्या शेकडो तक्रारी समोर आल्या आहेत. अकोला जिल्ह्यातच २०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून सुमारे २५ हजार हेक्टरवरील पेरणी प्रभावित झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

या प्रकरणाची दखल घेत कृषिमंत्र्यांनी विधानसभेत संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांची तपासणी सुरू असल्याचे सांगितले. बियाणे नियंत्रण कायद्यानुसार दोषी आढळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून त्यांचे बियाणे विक्री परवाने रद्द करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली.

दरम्यान, ८ जुलै रोजी पिंपरी-चिंचवडच्या मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मोशी डेपो हा शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रमुख केंद्रबिंदू असून वाढत्या कचऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वाघाळे येथून भक्तिमय वातावरणात न्यू वाघेश्वर दिंडीचे आषाढी वारीसाठी प्रस्थान…

शिरूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघाळे…

5 तास ago

‘अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या’; मुख्यमंत्री फडणवीसांकडे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचे निवेदन; महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे तातडीने शिफारस पाठवावी, अशी मागणी…

6 तास ago

एक तालुका – एक क्लस्टर’ योजनेला ब्रेक; राज्यातील १९१ तालुके अजूनही औद्योगिक विकासापासून वंचित; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील 'एक तालुका – एक क्लस्टर' योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याने महाराष्ट्रातील ३५५…

6 तास ago

पोलीस भरतीला वार्षिक कॅलेंडरची दिशा; सत्यजीत तांबे यांच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन मुंबई: राज्यातील लाखो…

6 तास ago

दादागिरी, खंडणी आणि धमक्यांना शून्य सहनशीलता; तक्रार करा, कठोर कारवाई करू – पीआय चंद्रशेखर यादव

शिक्रापूर पोलिसांची व्यापाऱ्यांसोबत समन्वय बैठक; वाहतूक, अतिक्रमण, पार्किंगसह सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन शिक्रापूर (अक्षय टेमगिरे):…

10 तास ago

कॅमेऱ्यासमोरील बडबड सोडा, मैदानात उतरून कर्तृत्व दाखवा; विरोधकांवर शिवसेनेचा निशाणा

मुंबई: विरोधकांनी कॅमेऱ्यांसमोर आक्रमक आणि अर्वाच्य भाषा वापरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे…

10 तास ago