महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो, कोणाचा बाप तुमचा रस्ता अडवू शकत नाही ‘या’ कायद्यानुसार मिळवा शेतरस्ता

मुंबई: शेती ही आपल्या देशाची जीवनदायिनी आहे. शेतकरी आपल्या कष्टाने देशाचे पोट भरतात. पण अनेकदा गावातील जमीनदार, काही शेजारी किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नाही.

यामुळे पिके सुकतात, उत्पादन घटते, शेतीमाल वेळेवर पोहोचत नाही. आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. पण आता चिंता करण्याची गरज नाही! कारण महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी स्पष्ट कायदेशीर मार्ग तयार केला आहे.

शेत रस्ता का आवश्यक आहे

शेतात जाण्यासाठी योग्य मार्ग नसेल, तर ट्रॅक्टर, बैलगाडी किंवा इतर वाहने शेतात पोहोचू शकत नाहीत.

खते, बियाणे आणि शेतीसाठी लागणारे साहित्य वेळेवर पोहोचत नाही.

उत्पादित माल बाजारात न्यायला उशीर होतो, ज्यामुळे शेतमालाचे नुकसान होते.

काही गावांमध्ये वाईट प्रवृत्तीचे लोक शेतकऱ्यांचा रस्ता जाणूनबुजून अडवतात.

कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता मिळण्याचा हक्क आहे.

कोणत्याही शेजारील शेतकऱ्याने किंवा गावातील जमिनदाराने हा रस्ता अडवू शकत नाही.

तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून शेत रस्ता अधिकृतरित्या मंजूर करून घेता येतो.

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

७/१२ उतारा; तुमच्या जमिनीचा कायदेशीर पुरावा

शेजारच्या शेतकऱ्यांची माहिती; त्यांची नावे, पत्ते आणि जमिनीचा तपशील

जमीन नकाशा; तुमच्या शेतीच्या सीमारेषा स्पष्ट दाखवणारा नकाशा

वाद असल्यास संबंधित कागदपत्रे; जर शेजाऱ्यांनी रस्ता बंद केला असेल, तर त्याचे पुरावे.

अर्ज कसा करावा

तहसील कार्यालयात शेत रस्त्यासाठी लेखी अर्ज द्या.

अर्जात तुमच्या जमिनीबाबत संपूर्ण माहिती द्या.

तुम्हाला शेत रस्ता का आवश्यक आहे, हे स्पष्ट सांगा

तहसीलदार तुमच्या अर्जाची छाननी करून लवकरच निर्णय देतील.

तहसीलदार काय करतात

शेतकऱ्याचा अर्ज मिळाल्यावर संबंधित जमिनीची पाहणी केली जाते.

शेजारील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले जाते.

गावकऱ्यांना बोलावून चर्चा केली जाते.

सर्व गोष्टींचा विचार करून शेत रस्ता मंजूर केला जातो.

अडथळा आल्यास कायदेशीर मार्ग अवलंबा

जर एखाद्या जमिनदाराने, शेजाऱ्याने किंवा कोणत्याही अधिकाऱ्याने तुमचा शेत रस्ता अडवला तर घाबरू नका.

फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम 133 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज द्या.

कोर्टाच्या आदेशाने शेत रस्ता उघडला जाईल आणि कोणत्याही अडथळ्याला कायदेशीर शिक्षा होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

5 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

9 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

9 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

9 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

9 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

9 तास ago