अंबरनाथ: ठाणे-कल्याणच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दांची तलवार उपसली गेली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर खासदार शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत नाईक यांना खुले आव्हान दिले आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. जनतेने त्यांना अनेक वेळा माजी केलं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. वयोमानानुसार त्यांना स्मृतिभ्रंश झाला असावा, त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत आहेत.”
यावेळी त्यांनी थेट आव्हान देत म्हटले, “जर एवढीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत कल्याण, ठाणे किंवा हवे त्या मतदारसंघातून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी. मैदानात या आणि जनतेचा कौल घ्या.”या वक्तव्यानंतर ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-नाईक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…
छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…