अंबरनाथ: ठाणे-कल्याणच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दांची तलवार उपसली गेली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर खासदार शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत नाईक यांना खुले आव्हान दिले आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. जनतेने त्यांना अनेक वेळा माजी केलं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. वयोमानानुसार त्यांना स्मृतिभ्रंश झाला असावा, त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत आहेत.”
यावेळी त्यांनी थेट आव्हान देत म्हटले, “जर एवढीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत कल्याण, ठाणे किंवा हवे त्या मतदारसंघातून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी. मैदानात या आणि जनतेचा कौल घ्या.”या वक्तव्यानंतर ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-नाईक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…
मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…
जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…