महाराष्ट्र

अखेर राहुल गांधींनी घोळाचे पुरावे दिलेच

कर्नाटक: काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून भारतीय निवडणूक आयोगावर सातत्याने मतदान चोरीचा आरोप केला जात आहे. त्याबाबत त्यांनी गुरूवारी काही महत्वाचे पुरावेच दिले आहेत. एकाच व्यक्तीचे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील मतदारयादीतही नाव असल्याचे समोर आले आहे. तसेच 70 ते 80 जण एकाच खोलीत राहत असल्याचा पत्ताही मतदारयादीत असल्याचे पुरावे राहुल यांनी दाखवले.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे मतदान चोरीचे ठोस पुरावे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. त्यांनी त्यासाठी कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांमधील घोळाची माहिती दिली. या मतदारयाद्यात त्यांनी यावेळी दाखवल्या.

लोकसभा निवडणुकीत महादेवपुरा मतदारसंघात 1 लाख 250 मतांची चोरी झाल्याचा दावा राहुल यांनी केला. पाचप्रकारे ही चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले. मतदारयादीत 11 हजार 965 डुप्लिकेट मतदार आढळले. तर 40 हजार 9 मतदारांच्या नावासमोरील पत्ते चुकीचे किंवा बनावट होते. एकाच पत्त्यावर तब्बल 10 हजार 452 मतदार आढळून आल्याचा मोठा दावाही त्यांनी केला. तर नवमतदारांच्या नोंदणीसाठीच्या फॉर्म 6 चा गैरवापर झाल्याचे 33 हजार 692 प्रकार घडल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.

काँग्रेसच्या टीमने काही पत्त्यांवर जाऊन मतदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित पत्यांवर मतदार आढळून आले नाहीत, असे राहुल यांनी सांगितले. एकाच घरात 70 ते 80 मतदारांची नोंद झाली होती. त्या घरांचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखविण्यात आले. हे केवळ एकाच मतदारसंघातील असून अशा अनेक मतदारसंघात से प्रकार घडल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.

श्रीवास्तव नावाच्या एका मतदाराचे कर्नाटकसह महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही मतदान असल्याचा पुरावा राहुल यांनी दाखविला. असे अनेक मतदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाकडून आम्हाला मतदारयाद्यांचा डिजिटल डेटा देण्यात आला नाही. त्यामुळे एकाच विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांची तपासणी करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. 40 ते 50 जणांची टीम अव्याहतपणे मतदारयाद्यांची तपासणी करत असल्याची माहिती राहुल यांनी दिली.

महाराष्ट्रातही घोळ

महाराष्ट्रातील निवडणुकीतही घोळ झाल्याचा आरोप राहुल यांनी पुन्हा केला. निवडणूक आयोगाकडे पक्षाने मशीन रिडेबल डाटा मागितला होता. सायंकाळी साडेपाचनंतर महाराष्ट्रात झालेल्या मतदानाबाबत प्रश्न होता. कारण प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर गर्दी नव्हती. सायंकाळी साडे पाचनंतर मतदारांच्या लांब रांगा नव्हत्या. याच कारणांमुळे आयोग भाजपसोबत असल्याचे जाणवले, असे राहुल गांधी यांनी सांगितले. महाराष्ट्रासारख्या राज्यांत मोठ्या प्रमाणात मतदार वाढले, पण ते कसे वाढले, कुठून आले, यंत्रणेही कसे काम केले, याचे पुरावे असल्याचेही राहुल म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

29 मिनिटे ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

38 मिनिटे ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

42 मिनिटे ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

51 मिनिटे ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

54 मिनिटे ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

56 मिनिटे ago