महाराष्ट्र

मुंबई निकालानंतर काँग्रेसमध्ये वाद! वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची भाई जगताप यांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला असताना काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

मुंबईत काँग्रेसला २४ जागा मिळाल्या असून अपेक्षेपेक्षा कामगिरी सुधारली असली तरी सत्तेच्या समीकरणात पक्षाची भूमिका मर्यादित राहिली आहे. निकालानंतर काही तासांतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी करत नेतृत्वावर थेट टीका केली.

“मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काँग्रेसच्या जागा घटल्या आहेत. रणनीतीचा अभाव आणि संघटनात्मक कमकुवतपणा स्पष्ट दिसतो. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून वर्षा गायकवाड यांनी पद सोडावे,” असे जगताप यांनी सांगितले.

माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष असलेल्या भाई जगताप यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील अंतर्गत असंतोष उघड झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सहकार्याने पक्षाला बळ मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र निकालानंतरची परिस्थिती पाहता ती अपेक्षा फेल ठरल्याचे चित्र आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

17 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

22 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

22 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

22 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

22 तास ago