मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला असताना काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
मुंबईत काँग्रेसला २४ जागा मिळाल्या असून अपेक्षेपेक्षा कामगिरी सुधारली असली तरी सत्तेच्या समीकरणात पक्षाची भूमिका मर्यादित राहिली आहे. निकालानंतर काही तासांतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी करत नेतृत्वावर थेट टीका केली.
“मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काँग्रेसच्या जागा घटल्या आहेत. रणनीतीचा अभाव आणि संघटनात्मक कमकुवतपणा स्पष्ट दिसतो. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून वर्षा गायकवाड यांनी पद सोडावे,” असे जगताप यांनी सांगितले.
माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष असलेल्या भाई जगताप यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील अंतर्गत असंतोष उघड झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सहकार्याने पक्षाला बळ मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र निकालानंतरची परिस्थिती पाहता ती अपेक्षा फेल ठरल्याचे चित्र आहे.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…