महाराष्ट्र

जगाचे नेतृत्व बदलले, पण भारताचे परराष्ट्र धोरण जुन्याच चौकटीत; प्रविण साहनींची मोदी सरकारवर टीका

अमेरिका–इराण युद्धानंतर जागतिक समीकरणे बदलल्याचा दावा; महाराष्ट्र काँग्रेसच्या चर्चासत्रात परराष्ट्र धोरणावर सखोल चर्चा

मुंबई: अमेरिका–इराण युद्धानंतर जगातील शक्ती-संतुलनात मोठा बदल झाला असून जग आता द्विध्रुवीय नसून बहुध्रुवीय बनले आहे. मात्र, भारताने बदलती जागतिक समीकरणे ओळखण्यात अपयश आल्याने देशाच्या परराष्ट्र धोरणासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत, असा दावा संरक्षण व युद्धनीती विषयाचे आंतरराष्ट्रीय भाष्यकार प्रविण साहनी यांनी केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन येथे आयोजित “अमेरिका–इराण युद्ध व भारतावर होणारे परिणाम” या विशेष चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. यावेळी माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई आणि सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला उपस्थित होते.

साहनी म्हणाले की, अमेरिका महायुद्ध आणि शीतयुद्ध जिंकली असली तरी २०१३ नंतर जगाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. रशिया, चीनसह इतर देशही प्रभावी शक्ती म्हणून उदयास आले असून पाकिस्तानचेही जागतिक महत्त्व वाढले आहे. अशा परिस्थितीत भारताने वास्तव स्वीकारून परराष्ट्र धोरणात बदल करणे आवश्यक आहे.

अमेरिका–इराण संघर्षात अमेरिकेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत साहनी यांनी सांगितले की, रशिया आणि चीनच्या मदतीमुळे इराणची लष्करी क्षमता अधिक मजबूत झाली आहे. हार्मूज सामुद्रधुनीवरील इराणचे नियंत्रण हे जागतिक व्यापार, तेल वाहतूक आणि इंटरनेट नेटवर्कच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने या युद्धाचे दूरगामी परिणाम होणार आहेत.

भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना त्यांनी म्हटले की, अमेरिका, रशिया आणि चीन या तिन्ही महासत्तांशी पाकिस्तानचे संबंध चांगले आहेत. मात्र, भारताने बदलती परिस्थिती समजून घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागू शकतात.

समारोपात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, युद्धाचे स्वरूप आता तंत्रज्ञानाधारित झाले असून “युद्ध नव्हे, बुद्ध” हीच भारताची भूमिका असली पाहिजे. २०१४ नंतर भारताच्या अनेक पारंपरिक मित्रदेशांशी संबंध कमकुवत झाल्याचा आरोप करत त्यांनी जागतिक घडामोडी समजून घेऊन देशहिताचे धोरण स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

3 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

7 तास ago