औरंगाबाद: सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल वाहनांव्यतिरिक्त आता बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. परंतु त्यांची किंमत जास्त असल्याने ग्राहकांना ही वाहने खरेदी करण्यासाठी थोडा विचार करावा लागतो, परंतु राज्यांनुसार सरकारकडून सबसिडी देखील दिली जात आहे. आता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठी घोषणा केली आहे.
येत्या एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांप्रमाणेच कमी केल्या जातील. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलवर खर्च होणारे परकीय चलन आपण वाचवू शकू, असेही ते म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या बॅटर्या खूप महाग असतात. म्हणजे EV च्या एकूण खर्चापैकी ३५ ते ४० टक्के या बॅटऱ्यांवर खर्च होतो, ज्यामुळे EVs ची किंमत जास्त असते. हा खर्च कमी करण्यासाठी सरकारकडूनही अनेक प्रयत्न केले जात आहेत. एवढेच नाही तर ग्राहकांना सुलभ चार्जिंग सुविधा देण्यासाठी अनेक ठिकाणी नवीन चार्जिंग स्टेशन्सही उभारण्यात येत आहेत. मंत्र्यांच्या घोषणेनंतर ईव्हीच्या किमती कमी होतील, हे निश्चित झाले आहे, मात्र त्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप निश्चित करता आलेले नाही.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…
मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…