महाराष्ट्र

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त?

औरंगाबाद: सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल वाहनांव्यतिरिक्त आता बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. परंतु त्यांची किंमत जास्त असल्याने ग्राहकांना ही वाहने खरेदी करण्यासाठी थोडा विचार करावा लागतो, परंतु राज्यांनुसार सरकारकडून सबसिडी देखील दिली जात आहे. आता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठी घोषणा केली आहे.

येत्या एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांप्रमाणेच कमी केल्या जातील. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलवर खर्च होणारे परकीय चलन आपण वाचवू शकू, असेही ते म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटर्‍या खूप महाग असतात. म्हणजे EV च्या एकूण खर्चापैकी ३५ ते ४० टक्के या बॅटऱ्यांवर खर्च होतो, ज्यामुळे EVs ची किंमत जास्त असते. हा खर्च कमी करण्यासाठी सरकारकडूनही अनेक प्रयत्न केले जात आहेत. एवढेच नाही तर ग्राहकांना सुलभ चार्जिंग सुविधा देण्यासाठी अनेक ठिकाणी नवीन चार्जिंग स्टेशन्सही उभारण्यात येत आहेत. मंत्र्यांच्या घोषणेनंतर ईव्हीच्या किमती कमी होतील, हे निश्चित झाले आहे, मात्र त्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप निश्चित करता आलेले नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

4 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

13 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

13 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

14 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

19 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

19 तास ago