महाराष्ट्र

जनतेच्या दारी शासन! ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाची मुंबईत प्रभावी अंमलबजावणी

मुंबई: जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाच्या (टप्पा-१) मुख्य उद्देश असून, या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.

या अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक नियोजन भवन येथे पार पडली. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, महेश हरिश्चंद्रे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले की, ७ मार्च, १४ मार्च, १० एप्रिल, ८ मे आणि १४ मे रोजी या अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून १५ प्रकारच्या सेवांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार असून प्रत्येक विभागाने सोपविलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.

शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले शाळेतच उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दाखल्यांबाबत माहिती देण्यासाठी मुख्याध्यापकांची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शासकीय कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज व निवेदने वेळेत निकाली काढावीत. शासनाने प्रत्येक कामासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून दिली असल्याने कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. प्रलंबित प्रकरणे आढळल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या अभियानांतर्गत फेरफार प्रकरणे, भूमी अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रे, अधिकार अभिलेख अद्ययावत करणे आदी सेवा तत्काळ उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, मिशन वात्सल्य यांसह विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

23 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

23 तास ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

23 तास ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

1 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

1 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

1 दिवस ago