महाराष्ट्र

जनतेच्या दारी शासन! ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाची मुंबईत प्रभावी अंमलबजावणी

मुंबई: जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाच्या (टप्पा-१) मुख्य उद्देश असून, या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.

या अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक नियोजन भवन येथे पार पडली. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, महेश हरिश्चंद्रे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले की, ७ मार्च, १४ मार्च, १० एप्रिल, ८ मे आणि १४ मे रोजी या अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून १५ प्रकारच्या सेवांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार असून प्रत्येक विभागाने सोपविलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.

शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले शाळेतच उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दाखल्यांबाबत माहिती देण्यासाठी मुख्याध्यापकांची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शासकीय कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज व निवेदने वेळेत निकाली काढावीत. शासनाने प्रत्येक कामासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून दिली असल्याने कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. प्रलंबित प्रकरणे आढळल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या अभियानांतर्गत फेरफार प्रकरणे, भूमी अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रे, अधिकार अभिलेख अद्ययावत करणे आदी सेवा तत्काळ उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, मिशन वात्सल्य यांसह विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

4 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

5 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

6 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

22 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago