संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अनेक वेळा वाद निर्माण होत आहेत. महापालिकेच्या आततायी कारवायांमुळे पोलिसांना विरोधाला सामोरे जावे लागत आहे. यावर आता पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे – “आधी नोटीस, मगच कारवाई”.
काय म्हणाले पोलीस आयुक्त
यापुढे कोणतीही थेट पाडापाडी होणार नाही.
प्रत्येक पाडापाडीपूर्वी मालमत्ताधारकाला ७ दिवसांची नोटीस मिळायला हवी
न्यायालयात असलेल्या प्रकरणांमध्ये घाई करू नये
नागरिकांना योग्य वेळ आणि संधी दिली पाहिजे.
मालमत्तेवर मार्किंग करा
शंका असतील तर त्याचे निरसन करा आणि त्यानंतरच कारवाई करा
महापालिका सगळ्या जबाबदाऱ्या टाळून थेट पोलिसांना पुढे करते, ही पद्धत आता चालणार नाही.
नारेगाव घटनेवरही घेतली ठाम भूमिका
नागरी मित्र पथकाने नारेगावमध्ये एका तरुणास लाथा मारल्याप्रकरणी प्रवीण पवार यांनी स्पष्ट केलं, की नागरी मित्र पथकाला कोणत्याही प्रकारच्या कारवाईचा अधिकार नाही. ते फक्त पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आहेत.
हर्सूलमध्ये ७ दिवस आधी दिली जाईल नोटीस
हर्सूल भागातील पाडापाडीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता ७ दिवस आधी नोटीस देण्यात येणार
३०० मालमत्तांवर पाडापाडीची कारवाई होणार
काही नागरिकांनी अतिक्रमण स्वतःहून काढलं
न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या प्रकरणांवर कायदेशीर मार्गानं कारवाई
वास्तुविशारदांची मनमानी थांबवा
पाडापाडीच्या धास्तीने नागरिक महापालिकेकडे आपली बांधकामं नियमित करण्यासाठी अर्ज करत आहेत. यामुळे वास्तुविशारदांची मागणी वाढली. पण ते अनधिकृत दर आकारून लोकांची आर्थिक लूट करत आहेत. कुणी १५ हजार, कुणी २५ हजार रुपये आकारतोय यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने टक्केवारी पद्धतीने दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…