महाराष्ट्र

महापौरपदासाठी घोडेबाजार! ठाकरे गटाचे नगरसेवक ‘बेपत्ता’ प्रकरण थेट पोलिसांत

कल्याण: राज्यातील महानगरपालिका निवडणुका संपल्या असल्या तरी महापौरपदासाठी सुरू असलेला राजकीय घोडेबाजार अजूनही थांबलेला नाही. आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी प्रत्येक महापालिकेत सर्वात मोठा पक्ष पूर्ण ताकदीने हालचाली करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) राजकारण सध्या प्रचंड तापले आहे.

कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या नगरसेवकांबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत असून, ठाकरे गटाने थेट ‘नगरसेवक बेपत्ता’ असल्याचे पोस्टर्स लावल्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळले आहे. अखेर हे संपूर्ण प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.

नेमके काय घडले.

कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक नॉट-रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या नगरसेवकांचे कुटुंबीयही संपर्काबाहेर असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर टीव्ही नाईन मराठीच्या टीमने ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या घरी भेट दिली. तेव्हा मधुर म्हात्रे यांचे आई-वडील आणि कुटुंबीयही आठवडाभरापासून घराबाहेर असल्याची माहिती समोर आली.

याच दरम्यान, कल्याण पश्चिमेतील ठाकरे गटाच्या नगरसेविका स्वप्नाली केणे यांचे पती विनोद केणेही बेपत्ता असल्याचे समोर आले. या सर्व घटनांनंतर नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी ठाकरे गटाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. खासदार संजय राऊत यांच्या आदेशानंतर ही तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे.

तक्रारीनंतर नवा ट्विस्ट – कुटुंबीय आक्रमक

ठाकरे गटाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असलेल्या नगरसेवकांच्या कुटुंबीयांनीच आता ठाकरे गटाविरोधात तक्रार दाखल केली आहे. नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देत, आमचा मुलगा आमच्या संपर्कात असून त्याला बेपत्ता ठरवून बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे.

या तक्रारीनंतर ठाकरे गटाच्या तीन पदाधिकाऱ्यांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पुढे काय?

नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार आणि त्याच नगरसेवकांच्या कुटुंबीयांकडून दाखल झालेली प्रतितक्रार, यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. महापौरपदाच्या गणितात या घडामोडींचा नेमका काय परिणाम होणार, नगरसेवक प्रत्यक्षात कुठे आहेत आणि पोलिस तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

16 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

16 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

16 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

16 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

21 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

21 तास ago