महाराष्ट्र

एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होत असाल तर ही काळजी घ्या अन्यथा…

मुंबई: बँक मोठं कर्ज देताना अनेक वेळा जामीनदाराची मागणी करते. बँका 2 प्रकारचे जामीनदार मागतात. एक म्हणजे गैर-आर्थिक हमीदार आणि दुसरा आर्थिक हमीदार. पहिल्यामध्ये तुमचा वापर फक्त संवादासाठी केला जाईल. तर दुसऱ्या प्रकरणात कर्जदाराने पैसे न भरल्यास तुमच्याकडून वसुली केली जाईल.

ज्या व्यक्तीसाठी तुम्ही गॅरेंटर बनत आहात त्या व्यक्तीला तुम्ही चांगलं ओळखता का, हे पाहा. तसेच त्याच्या कर्ज परतफेडीच्या हिस्ट्रीवर एक नजर टाका. त्यापूर्वी कर्जाची माहितीही घ्या. कर्जाचा जामीनदार बँकेला हमी देतो की कर्जदार कर्जाची परतफेड करेल. कर्जदार असे करण्यात अयशस्वी झाल्यास, हमीदार म्हणून मी कर्जाची परतफेड करेल.

नियमानुसार कर्जाला तुम्ही जामीनदार झाले आहात तर त्याने वेळेत कर्जाचे हप्ते भरले नाही तर त्यावेळी कर्जाची परतफेड म्हणून तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तो डिफॉल्टर होऊ शकतो. जर कर्जदार लोन डिफॉल्टर झाला तर त्याचा क्रेडिट स्कोअर खराब होईल. तसेच तुमच्या स्कोअरवरही परिणाम होईल. तुमच आर्थिक नुकसान होऊ शकत अशा परिस्थितीत तुम्ही पैसे घेतले नसले तरी विचित्र परिस्थितीमुळे तुम्ही धोक्यात येऊ शकता.

तुम्हाला भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. विमा काढून घ्या ज्यांच्यासाठी तुम्ही कर्जाचे जामीनदार होत आहात त्याला कर्जाचा विमा उतरवण्यास सांगा. कोणत्याही कारणाने कर्जदाराचा मृत्यू झाल्यास किंवा अन्य घटना घडल्यास कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी विमा कंपनीची असते. अशा प्रकारे तुमची अडचण वाढत नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

15 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

15 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

15 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

15 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

17 तास ago