सांगली: मुळची सांगलीची सुकन्या श्रद्धा सुदर्शन सदामते हिला सन २००५ मध्ये एका अपघातामुळे केशवपन करावे लागले तीने आपले केस वाढवण्याचा विचार केला आणि तो जिद्दीने अंमलात आणत केसांना कधीही कात्री न लावता चांगले ६ फुट केस वाढवले. त्याच जिद्दीचे फळ म्हणून तिच्या 6 फुटी केसांची नोंद इंडिया बुकने ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली आहे.
सांगली विश्रामबाग येथे राहणारी श्रद्धा सदामते २०१२ पासून शिक्षण व लग्नानंतर पुण्यात स्थायिक आहे. त्यांचा विवाह हेमंत वाघमारे यांच्याशी झाला. सन २००५ साली अकरावीत असताना तिचा दुर्देवाने एसटी अपघात झाला. त्यातून ती थोडक्यात बचावली, पण मेंदूला व पाठीला गंभीर दुखापत झाल्याने तिची ब्रेन सर्जरी करण्यात आली. यामध्ये तिचें संपूर्ण केशवपन करावे लागले. दुखापत झाल्याच्या वेदनेसोबत ऐन तारुण्यात केस गमावणे हे तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी व धक्कादायक होते. अशा अवस्थेत स्वत:ला स्विकारणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.
दुखापत बरी होण्यासाठी बरीच वर्षे लागली. दीड वर्षे तिने आरसा पाहिला नाही. शारीरिकदृष्ट्या बरं होण्यासाठी तीन वर्षे लागली. पण गेलेला आत्मविश्वास मिळवायला बराच कालावधी लोटला. यावेळी घरच्यांनी तेव्हा दिलेला आधार आणि त्यांचं खंबीरपणे पाठीशी उभं राहणं हेच औषधाचं काम करत होतं. अशाही परिस्थितीतून पुढे हार न मानता तीने १२ वी नंतर आर्किटेक्चर ग्रॅज्युएशन सांगलीत केले. तर आर्किटेक्चर कोर्समधील मास्टर्स डिग्रीसाठी ती पुण्यास गेली. जवळजवळ १६ वर्ष एकेक एम-एम केस वाढताना ती बघत आलीय.
श्रद्धाला त्याचे फळ आता मिळाले असून, ६ फूट लांब केसांसाठी तिची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. भारतातल्या सर्वात लांब केस असलेल्या महिलांमध्ये तिचे नाव नोंद झाले आहे. तिची बहीण डॉ. पूजा सदामते- नागराल ही ‘हवा येऊ द्या-होवू द्या व्हायरल’ ची उपविजेती आहे. बहिणीसह आई लता सदामते, वडील सुदर्शन सदामते व माऊ श्रेयश यांचं पाठबळ तिला वेळोवेळी मिळत आहे. त्या बळावरच ती जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…