महाराष्ट्र

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारतात गॅस तुटवडा? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

इराण: हॉरमुझ स्ट्राईट परिसरात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना भारतातील इंधन स्थितीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.

इराण कडून होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्याने अनेक कच्च्या तेलाची जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने हॉटेल व्यवसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव Sujata Sharma यांनी देशातील इंधन स्थितीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारताला दररोज सुमारे ५५ लाख बॅरल कच्च्या तेलाची गरज असते आणि सध्या त्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. भारत हा जगातील चौथा मोठा रिफायनरी देश असून देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन सुमारे २८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

शर्मा यांनी स्पष्ट केले की, देशात पेट्रोलियम उत्पादनाची कोणतीही कमतरता नाही. भारताच्या नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी सुमारे ६० टक्के गॅस आयातीद्वारे पूर्ण केला जातो आणि सध्या त्याचाही पुरवठा नियमित सुरू आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना कमर्शियल गॅस सिलिंडर आणि ४८ हजार लिटर रॉकेचा पुरवठा केला जाणार असून कोळशाचा पुरवठा देखील वाढवण्यात आला आहे.तसेच वितरणाबाबतही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात ४५ दिवसांनी एक सिलिंडर, तर शहरी भागात २५ दिवसांनी एक सिलिंडर देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, शिपिंग मंत्रालयाचे अधिकारी Rajesh Kumar यांनी सांगितले की जहाजांसाठी विशेष अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास कंट्रोल रूम सुरू ठेवण्यात आली आहे. भारतीय नाविकांच्या सुरक्षेला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावास सक्रिय असल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

12 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

21 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

21 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

22 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago