महाराष्ट्र

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारतात गॅस तुटवडा? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

इराण: हॉरमुझ स्ट्राईट परिसरात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना भारतातील इंधन स्थितीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.

इराण कडून होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्याने अनेक कच्च्या तेलाची जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने हॉटेल व्यवसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव Sujata Sharma यांनी देशातील इंधन स्थितीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारताला दररोज सुमारे ५५ लाख बॅरल कच्च्या तेलाची गरज असते आणि सध्या त्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. भारत हा जगातील चौथा मोठा रिफायनरी देश असून देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन सुमारे २८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

शर्मा यांनी स्पष्ट केले की, देशात पेट्रोलियम उत्पादनाची कोणतीही कमतरता नाही. भारताच्या नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी सुमारे ६० टक्के गॅस आयातीद्वारे पूर्ण केला जातो आणि सध्या त्याचाही पुरवठा नियमित सुरू आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना कमर्शियल गॅस सिलिंडर आणि ४८ हजार लिटर रॉकेचा पुरवठा केला जाणार असून कोळशाचा पुरवठा देखील वाढवण्यात आला आहे.तसेच वितरणाबाबतही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात ४५ दिवसांनी एक सिलिंडर, तर शहरी भागात २५ दिवसांनी एक सिलिंडर देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, शिपिंग मंत्रालयाचे अधिकारी Rajesh Kumar यांनी सांगितले की जहाजांसाठी विशेष अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास कंट्रोल रूम सुरू ठेवण्यात आली आहे. भारतीय नाविकांच्या सुरक्षेला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावास सक्रिय असल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

3 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

4 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

5 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

6 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

7 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

7 तास ago