महाराष्ट्र

न्याय निवडक आहे का! पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना नोटीसही नाही; अंजली दमानियांचा थेट सवाल

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल; फक्त शीतल तेजवानीवर आरोप, पार्थ पवारांना दिलासा

पुणे: पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी हिचेच नाव नमूद करण्यात आले असून, या प्रकरणात चर्चेत असलेले दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंढवा परिसरातील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप समोर आले होते. या प्रकरणी शीतल तेजवानी हिला मुख्य सूत्रधार आणि आरोपी ठरवण्यात आले असून, पुणे पोलिसांनी तिच्याविरोधात तब्बल १८८६ पानांचे विस्तृत आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात मात्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचा कोणताही उल्लेख नाही.

या प्रकरणात यापूर्वी पार्थ पवार यांच्यावर आरोप झाले होते. मात्र आर्थिक गुन्हे विभागाच्या तपासात त्यांच्याविरोधात पुरावे न आढळल्याने त्यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणातून त्यांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाच्या चौकशीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “महाराष्ट्र हा राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का? कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का? राजकारण्यांसाठी ‘न्याय’ हा शब्दच रद्द झाला आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यातील परस्पर दाखल दिवाणी दाव्यांचा उल्लेख करत, तसेच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा व्यवहार अवैध ठरवून रद्द करण्यासाठी केलेल्या अर्जाकडे लक्ष वेधले आहे. “मग या प्रकरणात जबाबदारी कोणाची? शिक्षा कोणाला?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, ईओडब्ल्यू (खडक पोलीस ठाणे) कडून फक्त शीतल तेजवानीवरच आरोपपत्र दाखल झाल्याने, दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्यावरील चौकशीबाबत नव्या चर्चेला उधाण आले आहे. “हा न्याय नाही, ही न्यायाची थट्टा आहे,” अशी टीकाही दमानिया यांनी केली आहे.मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील पुढील न्यायालयीन कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago