मुंबई: शालेय शिक्षण विभागातील ‘पवित्र’ पोर्टलप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षण विभागातही पारदर्शक पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
राज्यातील शासनमान्य विद्यापीठे व महाविद्यालयांमधील पदभरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टलसारखी केंद्रीकृत यंत्रणा निर्माण करण्यात येणार का, असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. त्यास उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते.
सध्याची भरती प्रक्रिया कशी?
मंत्री पाटील यांनी सांगितले की, शासनमान्य विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये पदभरती करताना आठ सदस्यांचे मुलाखत पॅनल असते.
पॅनलमधील प्रत्येक सदस्य उमेदवारांना गुण देतो.
संचालकांचा सहभाग प्रामुख्याने ‘ना हरकत’ देण्यापुरता मर्यादित असतो.
सर्व सदस्यांनी दिलेले गुण एकत्रित करून विद्यापीठाला कळविले जातात.
अंतिम मान्यता विद्यापीठाकडून दिली जाते.
सुधारित प्रक्रियेवर विचार
शिक्षण विभागाप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक पारदर्शक आणि सुधारित भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या असून, त्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभाग गांभीर्याने विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि एकसंधता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…