महाराष्ट्र

उच्च व तंत्रशिक्षणातही ‘पवित्र’सारखी भरती प्रक्रिया? मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सकारात्मक संकेत

मुंबई: शालेय शिक्षण विभागातील ‘पवित्र’ पोर्टलप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षण विभागातही पारदर्शक पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

राज्यातील शासनमान्य विद्यापीठे व महाविद्यालयांमधील पदभरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टलसारखी केंद्रीकृत यंत्रणा निर्माण करण्यात येणार का, असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. त्यास उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते.

सध्याची भरती प्रक्रिया कशी?

मंत्री पाटील यांनी सांगितले की, शासनमान्य विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये पदभरती करताना आठ सदस्यांचे मुलाखत पॅनल असते.

पॅनलमधील प्रत्येक सदस्य उमेदवारांना गुण देतो.

संचालकांचा सहभाग प्रामुख्याने ‘ना हरकत’ देण्यापुरता मर्यादित असतो.

सर्व सदस्यांनी दिलेले गुण एकत्रित करून विद्यापीठाला कळविले जातात.

अंतिम मान्यता विद्यापीठाकडून दिली जाते.

सुधारित प्रक्रियेवर विचार

शिक्षण विभागाप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक पारदर्शक आणि सुधारित भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या असून, त्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभाग गांभीर्याने विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि एकसंधता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू…; अजितदादांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंची भावनिक आदरांजली

दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली"; फडणवीसांच्या वाढदिवशी शिंदेंच्या भावना अनावर मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री…

8 मिनिटे ago

देवेंद्र! बस नाम ही काफी है; मुख्यमंत्री फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा

'महाराष्ट्राच्या राजकारणातील बिग डी' म्हणत फडणवीसांच्या नेतृत्व, बुद्धिमत्ता आणि विकासदृष्टीचे शिंदेंकडून भरभरून कौतुक मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र…

19 मिनिटे ago

रांजणगाव MIDC पोलिसांनी दुचाकी चोराला धाराशिवमधून केली अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील महागणपती पार्किंगमधून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावत…

24 मिनिटे ago

शिक्षकांच्या सूचनांवरच घडणार शिक्षणातील बदल; ‘शिक्षण संवाद २०२६’मध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व…

27 मिनिटे ago

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात काँग्रेसचा भाजपावर मोर्चा; राहुल गांधींना दिलेल्या वागणुकीचा निषेध

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी; परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी मुंबई:…

33 मिनिटे ago

झुरळ विचारांची पुरळ नव्हे, विकासाचा मार्ग निवडूया

मुंबई: भारतभूमी ही केवळ भौगोलिक सीमा नसून हजारो वर्षांची संस्कृती, ज्ञान, परंपरा, संघर्ष आणि सामर्थ्याची…

39 मिनिटे ago