दिल्ली: उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राजीनामा दिल्यापासून गायब आहेत. ते नेमके कुठे आहे? त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे खासदार सांगत आहेत. खासदार कपिल सिब्बल यांनी धनखड यांच्या विषयी काळजी व्यक्त केली होती. आता शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवत जगदीप धनखड कुठे आहेत याची विचारणा केली आहे.
‘आपल्या उपराष्ट्रपतींच्या बाबतीत नक्की काय घडले आहे? ते कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? ते सुरक्षित आहेत का? देशाला या प्रश्नांची खरी माहिती मिळाली पाहिजे. दिल्लीमध्ये अफवा पसरत आहेत की धनखड यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले असून ते सुरक्षित नाहीत.’, असे राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की,’राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित मी हे पत्र विशिष्ट कारणासाठी लिहित आहे. 21 जुलैला अचानक उपराष्ट्रपतींनी यांनी सायंकाळी सहानंतर प्रकृती कारणास्तव राजीनामा दिल्याची घोषणा झाली. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.पण यापेक्षाही धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे 21 जुलैपासून आजपर्यंत आपल्या उपराष्ट्रपतींच्या ठिकाणाबाबत कुठलीही माहिती उपलब्ध नाही.’
‘ते सध्या कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? या बाबींवर कोणतीही स्पष्टता नाही. राज्यसभेतील काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश आले. त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संवाद साधता आला नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.’, असे देखील राऊत यांनी सांगितले आहे.
सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वी…
‘राज्यसभेतील खासदार तर सर्वोच्च न्यायालयात ‘हेबिअस कॉर्पस’ याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत. कारण आम्हाला धनखड यांच्या ठिकाणाबाबत व त्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी वाटत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दारात जाण्यापूर्वी मी आपल्याकडून माहिती मागणे योग्य ठरेल असे मला वाटले. आपण माझी भावना समजून घ्याल आणि जगदीप धनखड यांच्या सध्याच्या ठिकाणाबाबत तसेच त्यांच्या सुरक्षितते व प्रकृतीबाबत खरी माहिती द्याल, अशी मला आशा आहे.’ असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…
मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…
मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…