दिल्ली: उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राजीनामा दिल्यापासून गायब आहेत. ते नेमके कुठे आहे? त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे खासदार सांगत आहेत. खासदार कपिल सिब्बल यांनी धनखड यांच्या विषयी काळजी व्यक्त केली होती. आता शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवत जगदीप धनखड कुठे आहेत याची विचारणा केली आहे.
‘आपल्या उपराष्ट्रपतींच्या बाबतीत नक्की काय घडले आहे? ते कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? ते सुरक्षित आहेत का? देशाला या प्रश्नांची खरी माहिती मिळाली पाहिजे. दिल्लीमध्ये अफवा पसरत आहेत की धनखड यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले असून ते सुरक्षित नाहीत.’, असे राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की,’राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित मी हे पत्र विशिष्ट कारणासाठी लिहित आहे. 21 जुलैला अचानक उपराष्ट्रपतींनी यांनी सायंकाळी सहानंतर प्रकृती कारणास्तव राजीनामा दिल्याची घोषणा झाली. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.पण यापेक्षाही धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे 21 जुलैपासून आजपर्यंत आपल्या उपराष्ट्रपतींच्या ठिकाणाबाबत कुठलीही माहिती उपलब्ध नाही.’
‘ते सध्या कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? या बाबींवर कोणतीही स्पष्टता नाही. राज्यसभेतील काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश आले. त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संवाद साधता आला नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.’, असे देखील राऊत यांनी सांगितले आहे.
सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वी…
‘राज्यसभेतील खासदार तर सर्वोच्च न्यायालयात ‘हेबिअस कॉर्पस’ याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत. कारण आम्हाला धनखड यांच्या ठिकाणाबाबत व त्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी वाटत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दारात जाण्यापूर्वी मी आपल्याकडून माहिती मागणे योग्य ठरेल असे मला वाटले. आपण माझी भावना समजून घ्याल आणि जगदीप धनखड यांच्या सध्याच्या ठिकाणाबाबत तसेच त्यांच्या सुरक्षितते व प्रकृतीबाबत खरी माहिती द्याल, अशी मला आशा आहे.’ असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…