महाराष्ट्र

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; हार्ट अटॅक आलेल्या शिक्षकासाठी डॉक्टरच देवदूत ठरले

नंदूरबार: मुलीच्या उपचारासाठी रुग्णालयात आले असताना तिच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध होऊन त्यांनी मान टाकली. सोबत असलेल्या मुलीच्या आणि पत्नीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल. त्यावेळी डॉक्टर देवा सारखे धावून आले. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका आदर्श शिक्षकाचे प्राण वाचल्याची सुखद घटना तळोदा शहरात घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये काहीच झाले असून डॉक्टरांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

अचानक बेचैन होऊन बेशुद्ध झाले

तळोदा शहरातील नेमसुशील विद्यामंदिर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या 42 वर्षीय रविंद्र अरुण गुरव हे आपल्या मुलीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात आले होते. त्यावेळी डॉक्टरांसमोर बसले असताना ते अचानक बेचैन झाले. बेचैन अवस्थेत असताना अचानक ते बेशुद्ध होऊन त्यांनी मान टाकली. सोबत असलेल्या त्यांची कन्या व पत्नीच्या डोळ्यात अश्रू दाटले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. योगेश चौधरी यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला हेड-लो पोजिशनमध्ये घेतले. तत्पश्चात तपासणीदरम्यान रुग्णाचे हृदय आणि ठोके थांबल्याचे निदर्शनास आले. हृदयक्रिया थांबल्याचे लक्षात येताच डॉ. चौधरी यांनी तातडीने सीपीआर प्रक्रिया सुरू केली. काही क्षणांतच हृदय पुन्हा चालू झाले आणि शरीरातील रक्तपुरवठा पूर्ववत झाला. रुग्ण शुद्धीवर आल्यावर त्यांना त्वरित दाखल करून पुढील उपचार करण्यात आले.

घटनेतून सीपीआर पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करत लवकरच मोफत सीपीआर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचा मानस व्यक्त केला. इच्छुक स्वयंसेवकांनी नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे,” असेही डॉ. चौधरी म्हणाले.

रविंद्र अरुण गुरव हे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असून तंत्रस्नेही शिक्षक म्हणून जिल्ह्यात प्रचलित आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. देवदूता सारखे धावून आलेले डॉक्टरांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

9 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

9 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

10 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

10 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

1 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

1 दिवस ago