महाराष्ट्र

महाराष्ट्रातील त्या नेत्याच्या फक्त एका निर्णयामुळे पुण्यातील हिंजवडी जगप्रसिद्ध IT पार्क उभे राहिले

रातोरात कोट्यावधीची उलाढाल आणि…

पुणे: हिंजवडी पुण्यातील सर्वात मोठा IT पार्क. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा IT हब फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अनेक इंटरनॅशनल कंपन्यांची कार्यालये या हिंजवडी IT पार्क मध्ये आहेत.

रातोरात येथे कोट्यावधीची उलाढाल होते. हिंजवडी IT पार्क एक ओसाड माळरान होते. या जागेवर साखर कारखाना उभा राहणार होता. या साखर कारखान्याचे भूमीपूजन देखील झाले होते. मात्र, महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेत्याच्या फक्त एका निर्णयामुळे पुण्यातील हिंजवडी जगप्रसिद्ध IT पार्क उभे राहिले.

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क 2800 एकर जागेवर परसलेले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC ने हे हिंजवडीचे IT पार्क उभारले. हिंजवडीचे IT पार्क मध्ये जवळपास एक हजारच्या आसपास नॅशनल तसेच इंटरनॅशनल IT कंपन्यांची कार्यालये आहेत. 3 लाखांपेक्षा जास्त लोक येथे काम करतात. हिंजवडीचे IT पार्क मध्ये रातोरात कोट्यावधीची उलाढाल होते.

महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेते अशी ओळख असलेले शरद पवार यांच्या पुढाकारामुळेच हिंजवडीचे IT पार्क उभे राहिले. अनेकदा स्वत: शरद पवार यांनी याबाबत सांगितले आहे. याबाबतचा एक किस्सा ने नेहमी आवर्जून सांगतात तो म्हणजे… हिंजवडी आयटी पार्क ऐवजी येथे साखर कारखाना होणार होता. मला खा. नानासाहेब नवले, मदन बाफना यांनी भूमिपूजनासाठी बोलावले. भाषणात मी म्हटले की आज भूमिपूजन जरी केले तरी येथे साखर कारखाना होणार नाही. माझ्या सुरुवातीच्या वाक्यानेच आयोजकांचा चेहरा पडला. त्यांना माझा रागही आला असावा.

हिंजवडीच्या परिसरातील साखर कारखान्याची जागा नानासाहेब नवले यांनी सॉफ्टवेअर पार्कसाठी दिली ती शरद पवारांच्या एका निर्णयामुळे. साखर कारखान्याचे भूमीपूजन झाल्यानंतर शरद पवार यांनी या जागेऐवजी तुम्हाला पर्यायी जागा देतो, तेथे तुम्ही कारखाना सुरु करा, असे नानासाहेब नवले यांनी सुचविले. कारण साखर कारखान्याचे भूमीपूजन होण्याआधी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी पुण्याशेजारी सॉफ्टवेअर उद्योगासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे असे शरद पवारांना सुचवले.

शरद पवारांनी तात्काळ यावर कार्यवाही करत हिंजवडीच्या परिसरातील साखर कारखान्याची जागा IT पार्कसाछी उलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आणि नानासाहेब नवले यांच्याशी चर्चा करुन त्यांना पर्यायी जागा उलपब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. mनानासाहेब नवले यांनीही शरद पवारांची विनंती मान्य करत त्यांच्या कारखान्याची जागा IT पार्कसाठी दिली. शरद पवारांच्या एका निर्णयामुळे हिंजवडीचे IT पार्क उभे राहिले. पुण्याचा सॉफ्टवेअर उद्योगाची उलाढाल आणि निर्यात आज दोन लाख कोटींवर आहे. दरम्यान, सध्या हिंजवडी IT पार्कमध्ये काम करणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

31 मिनिटे ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

1 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

2 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

4 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

4 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

4 तास ago